मुंबई

संजय गांधी उद्यानात बिबट्यांचा समतोल सहवास

CD

संजय गांधी उद्यानात बिबट्यांचा समतोल सहवास
ठाणे शहर, ता. २० ः पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील मानवी वसाहतींमध्ये बिबट्यांच्या दहशतीचे वातावरण असताना, मुंबई आणि ठाणे परिसरातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात (SGNP) मात्र बिबट्या आणि मानवी वसाहतींमध्ये सहजीवन दिसत आहे. वन विभागाच्या योग्य नियोजनामुळे आणि उद्यानात मुबलक अन्न-पाणी उपलब्ध असल्याने येथील बिबट्यांची मानवी वसाहतीतील भटकंती थंडावली आहे. वन विभागाच्या योग्य नियोजनामुळे हे चित्र निर्माण झाले आहे.

ठाणे आणि मुंबईच्या विस्तृत जागेत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पसरले आहे. उद्यानाचे क्षेत्रफळ १०,६९५.०४१ हेक्टरमध्ये पसरले आहे. या उद्यानाच्या भोवती दाटीवाटीने नागरी वसाहती उभ्या राहिलेल्या असतानाही या वसाहतींच्या अगदी काही मीटर अंतरावरील जंगलात मुक्त वावरणारे बिबटे आणि माणसांचा आमनासामना होताना दिसत नाही. क्वचितच एखादवेळेस मानवी वसाहतीतील भटक्या श्वानाची चाहूल लागली तर तो त्याच्या शिकारीसाठी तेथे येतो, तसेच कोणत्याही माणसाला काहीही त्रास न देता आपल्या अधिवासात निघून जातो. एवढेच नव्हे तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यांतील लोकांनाही त्याच्याकडून इजा पोहोचवण्याची कृती घडत नाही. येथील आदिवासी आणि बिबटे जणू जगा आणि जगू द्याच्या नियमाप्रमाणे वागत असल्याचे दिसते.

वन विभागाचे नियोजन
संरक्षण भिंती
वन विभागाने जंगलाच्या भोवताली गरजेच्या ठिकाणी आरसीसीच्या आठ-नऊ फूट उंच संरक्षण भिंती बांधल्या आहेत, ज्यामुळे बिबट्यांचा मानवी वसाहतीत प्रवेश प्रतिबंधित होतो. उर्वरित ठिकाणीही लवकरच भिंती बांधल्या जातील.

मुबलक अन्न-पाणी
जंगलात प्रत्येक वन्यजीवाला जगण्यासाठी लागणारे अन्न, पाणी आणि निवारा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.
जंगल संरक्षित आणि सुरक्षित असल्याने वन्य साखळीचा समतोल राखला जातो, ज्यामुळे बिबट्यांना शिकारीसाठी भटकंती करावी लागत नाही.

आदिवासींचा सहभाग
जंगलातील पाड्यांमध्ये (१०-१५ घरांची वसाहत) राहणारे आदिवासी कित्येक वर्षांपासून वन्य प्राण्यांसोबत सौहार्दाने राहतात आणि ते एकमेकांचा आदर राखत निसर्ग नियमानुसार जीवन जगतात.

वन परिक्षेत्राचे विभाजन
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान वन विभागाच्या तीन कार्यक्षेत्रात (वन परिक्षेत्र) विभागलेले आहे.
वन परिक्षेत्र क्षेत्रफळ (हेक्टर)
येऊर ५९२३.९०३
तुलसी २८८७.८३५
कृष्णगिरी उपवन १८८३.३०३


बिबटेच नव्हे, तर सर्वच वन्य प्राणी अन्न, पाणी आणि निवारा यांच्या शोधात असतात. यात अडथळे आले की ते मानवी वसाहतीत असलेल्या कुत्र्यांसारखे सहज शिकार करता येणारे प्राणी शोधतात. येऊर वन परिक्षेत्रात मात्र त्यांच्या सर्व गरजा भागल्या जात असल्याने त्यांची भटकंती होत नाही. विभागाने आवश्यक ठिकाणी संरक्षण भिंती उभ्या केल्या आहेत आणि येथे मानवाच्या (अनधिकृत) प्रवेशाला प्रतिबंध आहे.
- मयूर सुरवसे, वन परिक्षेत्र अधिकारी, येऊर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat Accident : दोन दिवस जेवलो नाही, खूप शोधलं पण... ताम्हिणी घाटातील अपघाताचे दृश्य पाहून मृत तरुणांचे मित्र ढसाढसा रडले

Mangalwedha News : कात्राळचे शहीद जवान बाळासाहेब पांढरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Pachod Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण जागीच ठार; पाचोड पैठण रस्त्यावरील घटना

Delhi Mumbai Express way : दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे वर आता हेलिकॉप्टरची सेवा; अपघातातील जखमींना एअरलिफ्ट करता येणार, पर्यटनालाही चालना

Latest Marathi News Update : देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT