५९ जागांसाठी २७९ उमेदवार रिंगणात
अंबरनाथमध्ये ६४ जणांची माघार
अंबरनाथ, ता. २२ (वार्ताहर) ः अंबरनाथ नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया संपल्यानंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. नगरसेवकपदासाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांपैकी तब्बल ६४ जणांनी माघार घेतली असून आता २७९ उमेदवार रिंगणात उरले आहेत. २९ प्रभागांमधील एकूण ५९ जागांसाठी ही निवडणूक होत आहे.
सार्वत्रिक निवडूक २०२५ अंबरनाथमध्ये नगराध्यक्षपदासाठी एकूण १४ अर्ज दाखल झाले होते. छाननीदरम्यान तीन अर्ज अवैध ठरले असून ११ अर्ज वैध राहिले आहेत. विशेष म्हणजे, अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी नगराध्यक्षपदासाठी एकाही उमेदवाराने माघार घेतलेली नाही. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठीची ही स्पर्धा आता ११ उमेदवारांमध्ये रंगणार आहे. नगरसेवकपदासाठी सुरुवातीला ४०० अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी छाननीदरम्यान ५७ अर्ज बाद झाले असून अंतिम दिवशी माघार घेतलेल्या ६४ उमेदवारांपैकी ५७ जण अपक्ष आहेत. त्यामुळे आता एकूण २७९ उमेदवारांची निवडणूक लढत निश्चित झाली आहे.
लढत चुरशीची होणार
भाजपच्या प्रभाग १७-बी मधील राजेंद्र कुलकर्णी व प्रभाग २४-बी मधील स्वप्नाली माहुरकर यांनी अर्ज मागे घेतला. प्रहार जनशक्ती पक्षाचे दत्तात्रय घोगरे (प्रभाग २-बी) यांनीही माघार घेतली. शिवसेना ठाकरे गटाचे अरबाज कुरेशी (प्रभाग १५-बी) आणि संघजा मेश्राम (प्रभाग १८-ए) यांनी अर्ज मागे घेतला. काँग्रेसच्या रूपाली तायडे (प्रभाग १८-बी) यांनीही माघार घेतल्याचे कळते. तर ५७ अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याचे पालिकेने जाहीर केले आहे. अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याने अंबरनाथमधील निवडणूक लढती अधिक चुरशीची होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.