मुंबई

अपुऱ्या सेवेचा प्रवाशांवर भार

CD

पालघर, ता. २२ ः पश्विम रेल्वेमार्गावरील वैतरणा ते डहाणू परिसरातील प्रवाशांसाठी तोकड्या सेवा असल्याने वारंवार अन्याय होत आहे. उपनगरीय रेल्वेचा दर्जा मिळाला असला तरी त्या तुलनेत आवश्यक सुविधा मिळालेल्या नाहीत. डहाणू लोकल सुरू होऊन दशकाचा टप्पा ओलांडला; मात्र लोकलच्या मोजक्याच फेऱ्या सुरू आहेत. उपनगरीय सेवांच्या नावाखाली मोठा कर जमा होत असला तरी लोकलच्या फेऱ्या वाढवण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासन उदासीन आहे. त्यामुळे प्रवासीवर्गाकडून संताप व्यक्त होत आहे.

विरार-डहाणू रेल्वेमार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी अजून काही वर्षे लागणार आहेत. पालघर विकासाचे केंद्रबिंदू असल्याने लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या पाच वर्षांत रेल्वे प्रवासीवर्गाची संख्या दुप्पट ते तिप्पट झाली आहे. लोकल सेवा कमी असल्याने गर्दीचा जीवघेणा प्रवास करावा लागतो. सध्या दोनच लोहमार्ग असल्याने लोकल सेवा वाढविण्यासाठी मार्ग उपलब्ध नसल्याचे रेल्वेकडून वारंवार म्हटले जाते.

दिवसागणिक वैतरणा ते डहाणू भागातील वाढती रेल्वे प्रवासी संख्या लक्षात घेता स्थानिक लोकल फेऱ्या वाढवणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने रेल्वे प्रवासी आणि संघटनांची सातत्यपूर्ण मागणी सुरूच आहे. सामान्य नोकरदार, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला अशा प्रवाशांना अपुऱ्या रेल्वेसेवांमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. रेल्वे गाड्या सायडिंग करण्याच्या प्रकारामुळे प्रवासी हैराण आहेत. रेल्वे स्थानकावरील मूलभूत-भौतिक सुविधा दुर्लक्षित आहेत. गेल्या दहा वर्षांमध्ये डहाणू ते विरार व चर्चगेट अशा सुमारे २० लोकल सेवा आहेत, तर लांब पल्ल्याच्या गाड्या पकडून दिवसांत केवळ ५० फेऱ्या आहेत. लोकल सेवांच्या बाबतीत येथील प्रवासीवर्गावर दुजाभाव कायम आहे, असे रेल्वे प्रवासी संघटनांचे म्हणणे आहे.

प्रवासीवर्गामध्ये वाढ
पालघर जिल्हा एक नवीन मुंबई बनू पाहत असली तरी मर्यादित लोकल सेवांमुळे येथील अनेक बाबींवर परिणाम जाणवत आहे. डहाणू-वैतरणा भागातील नोकरवर्ग मोठ्या प्रमाणात मुंबईकडे शासकीय, निमशासकीय, खासगी नोकरीसाठी जातो. तारापूर औद्योगिक वसाहत, जिल्हा मुख्यालय, डहाणू औष्णिक विद्युत प्रकल्प येथेही मुंबईकडून येणाऱ्या नोकरदारांची संख्या लक्षणीय आहे.

प्रवाशांसाठी डोकेदुखी
अलीकडील काळात रेल्वे प्रवासीवर्गात मोठी वाढ झाल्याने प्रचंड गर्दीचा सामना करावा लागतो. ऐन कामाच्या प्रहरी लोकलमधील गर्दी प्रवाशांना डोकेदुखी ठरू लागली आहे. जानेवारीमध्ये जाहीर होणाऱ्या रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये पालघर जिल्ह्यातील लोकल सेवा वाढतील, अशा अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.

सध्या कार्यरत सेवा
लोकल - २१ अप २१ डाऊन
शटल/पॅसेंजर - ६ अप ६ डाऊन
मेमू - ६ अप ६ डाऊन
एकूण - ३३ अप ३३ डाऊन

डहाणू लोकल सुरू होऊन १३ वर्षे झाली आहेत. किमान लोकलच्या अप-डाऊन अशा प्रत्येकी २५ फेऱ्या होणे अपेक्षित होते. जानेवारीच्या नवीन वेळापत्रकात डहाणू लोकलच्या पाच अप-डाऊन, तर डहाणू-भिवंडी (दिवामार्गे) मेमूच्या दररोज तीन फेऱ्या वाढविणे आवश्यक आहे.
- दयानंद पाटील, रेल्वे प्रवासी, केळवे रोड

डहाणू परिसरात सेवा वाढवाव्यात, म्हणून दीड वर्षांत पाच वेळा निवेदने देऊन प्रशासन आणि केंद्र सरकारबरोबर चर्चा केली आहे. प्रवासीवर्गाच्या समस्या रास्त आहेत. हा प्रश्न येत्या लोकसभा अधिवेशनात मांडून तो तडीस नेण्याचा प्रयत्न आहे.
- डॉ. हेमंत सवरा, खासदार, पालघर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chrome Users Warning : 'क्रोम युजर्स'साठी सरकारी एजन्सीने जारी केला गंभीर इशारा!

Eknath Shinde: राजस्थानमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला इशारा, निवडणुकीवरुन दिला 'हा' अल्टिमेटम

Latest Marathi News Update : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Marathwada Crime : कडेठाण येथे मुलाने केला पित्याचा खून; प्रेत पुरले घरात; आठ दिवसानंतर घटना उघडकीस!

Theur Crime : पिऊन रस्त्यावर पडलेल्या व्यक्तीला उचलुन बाजुला करण्याकरीता गेलेल्या दोघांना तिघांनी केली मारहाण!

SCROLL FOR NEXT