मुंबई

हंगामी फळांची बाजारात आवक

CD

हंगामी फळांची बाजारात आवक
वाशी, ता. २४ (बातमीदार) ः मुंबई एपीएमसीत परराज्यातून फळांची आवक होत आहे. धार्मिक उपवास-व्रतवैकल्ये, पूजेसाठीची फळे, थंडीतील पोषणासाठीची फळे खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे बाजारात १० ते २० टक्क्यांनी भाव कमी झाले आहेत.
मार्गशीर्ष महिन्यात उपवास, पूजेसाठी लागणाऱ्या फळांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. किरकोळ बाजारात तर पूजेसाठी लागणाऱ्या पाच फळांचे वाटे तयार करून विकले जातात. त्यामुळे किरकोळ विक्रेत्यांना चांगला नफा मिळत आहे. मुंबई एपीएमसी फळ बाजारात संत्री, मोसंबी, पेरू, सीताफळ, सफरचंद, कलिंगड अशा फळांसोबतच परदेशी फळांची आवक वाढली आहे. त्याचबरोबर अंजीर, द्राक्ष, बोर, स्ट्रॉबेरी, अमरफळ, चिकू, खरबूज बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे हंगामातील फळांचे भाव डिसेंबरनंतर कमी होण्याची शक्यता असल्याचे फळ व्यापारी अशोक उंडे यांनी सांगितले.
---------------------
फळांचे प्रकार सध्याचे भाव (प्रतिकिलो)
अननस - ४०
अंजीर - ५०-६०
बोर - ४०-५०
चिकू - ४०-५०
डाळिंब - १५०-२००
ड्रॅगन फ्रूट - ९०
कलिंगड - १५-२०
केळी - ३०-४०
मोसंबी - ५०-६०
पपई - १५-२०
पेरू - ५५-६०
संत्रे - ४०-५०
सीताफळ - ५०-६०
स्ट्रॉबेरी - ३५०-४५०
खरबूज - ३५-४५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Hit-and-Run Case: नाशिकमध्ये पुण्यातील ‘पोर्श’सारखा थरार! CCTV मध्ये भीषण हिट अँड रन कैद; बड्या बापाचा अल्पवयीन मुलगा ताब्यात

Latest Marathi News Live Update : मुलुंड पूर्व द्रुतगती मार्गावर तरुणांकडून धोकादायक स्टंटबाजी केल्याचा व्हिडिओ व्हायरल, पोलिसांकडून शोध सुरू

नवीन ट्विस्ट! पाकिस्तानचा डाव त्यांच्यावरच उलटणार; बांगलादेaश T20 World Cup मध्ये परतणार, जय शाह करेक्ट कार्यक्रम करणार

ठाणे, रायगड, नंदुरबारला अवकाळी पावसाने झोडपलं; राज्यात ढगाळ वातावरण, आंब्यासह रब्बी हंगामातील पिकं धोक्यात

१९ वर्षांपूर्वी सुरू झालेली चर्चा, आता निर्णय; भारत EU व्यापारी करारावर आज होणार शिक्कामोर्तब

SCROLL FOR NEXT