मुंबई

साकव अभावी नागरिकांचा धोकादायक प्रवास

CD

धोकादायक प्रवास
जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील १८७ साकव अपूर्ण
राहुल क्षीरसागर ः सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २९ : मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील नागरिकांचा धोकादायक प्रवास थांबलेला नाही. मागील दोन वर्षांत ३१८ साकव (लहान पूल) मंजूर होऊनही, आजही १८७ साकवांचे काम अपूर्ण आहे. यामुळे पावसाळ्यात नदी-नाले ओलांडण्यासाठी येथील ग्रामस्थांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. विशेषतः शाळेत जाणाऱ्या मुलांचे हाल होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण व आदिवासी पट्ट्यात साकव व पुलांची कमतरता ही समस्या वर्षानुवर्षे कायम असून पावसाळा जवळ आला की ती अधिक गंभीर रूप धारण करते. अनेक भागांमध्ये ओढे, नाले आणि लहान नद्यांना ओलांडणे हे नागरिकांसाठी जीवघेणे ठरते. विशेषतः शालेय मुलांना शाळेत पोहोचण्यासाठी वाहत्या पाण्यातून पाय रोवून पुढे जावे लागते. या पाण्यात पुस्तके व वह्या भिजू नयेत म्हणून ती डोक्यावर घेऊन मुले जीवघेणा प्रवास करतात. बाजारहाट, अंगणवाडी, आरोग्य केंद्र किंवा शेतमजुरीसाठी दररोज पाण्यातून वाट काढावी लागते. प्रवाहाचा वेग वाढल्यास तोल जाऊन वाहून जाण्याचे प्रसंगदेखील घडतात. त्यामुळे काही ठिकाणी ग्रामस्थांनी स्वतःहून तात्पुरते बांबू, लाकूड वा दगड टाकून वाट तयार केली आहे. तरी पावसाच्या पाण्याचा जोर वाढला की हे तात्पुरते मार्ग काही तासांत वाहून जातात.

कामाला सुरुवातच नाही
ठाणे जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील विविध गावांमध्ये आवश्यकतेनुसार साकव बांधण्यात येतात. त्यानुसार मागील दोन वर्षांत ३१८ साकव मंजूर करण्यात आले. त्यापैकी १३१ साकव पूर्ण झाले असून १८७ साकव आजही अपूर्ण आहेत. विशेष म्हणजे, सन २०२४-२५ या कालावधीत मंजूर करण्यात आलेल्या १३८ साकवांपैकी एकही साकव बांधण्याच्या कामाला सुरुवातच करण्यात आली नसल्याची माहिती समोर आली आहे.

आरोग्यसेवेत मोठी अडचण
साकव नसल्यामुळे आरोग्यसेवा मिळणे हे सर्वांत कठीण काम होते. आकस्मिक परिस्थितीत रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी पर्यायी सुरक्षित मार्ग नसल्याने वेळेवर उपचार मिळणे अवघड होते. गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी दवाखान्यात नेण्यासाठी चारचाकी वाहन अथवा रुग्णवाहिकादेखील गावात पोहोचू न शकल्यामुळे गावकऱ्यांना अनेकदा साडीची झोळी तयार करून मानवी खांद्यावरून नदी ओलांडावी लागते.

शैक्षणिक व आर्थिक व्यवहारांवर परिणाम
सुरक्षित प्रवास नसल्यामुळे मुलांचे शाळेत जाणे अनियमित होते आणि अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण पावसाळ्यात खंडित होते. शेतकरीवर्गालाही मोठा फटका बसतो. पिकांसाठी आवश्यक सामग्री आणणे, उत्पादने बाजारात नेणे किंवा शेतकामासाठी मजूर बोलावणे या सर्व गोष्टी धोकादायक व खर्चिक ठरतात.

नियोजनाचा अभाव
नियोजन विभागाकडून यंदाच्या वर्षी २०२४-२५ साठी १५० साकवांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी १३८ साकव बांधण्यास मंजुरी देण्यात आली आहे. असे असले तरी, यंदा साकव मंजूर होऊनदेखील नियोजन विभागात नियोजनाच्या अभावामुळे एकही साकव बांधण्याच्या कामाला सुरुवात होऊ शकली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सन २०२४-२५ साकव मंजूर आकडेवारी
तालुके मंजूर साकव

शहापूर ८६
मुरबाड ०९
अंबरनाथ १८
कल्याण ११
भिवंडी १४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! आठव्या वेतन आयोगानुसार किमान 'इतका' असेल पगार, आकडा आला समोर

IND vs NZ 3rd T20I : भारताने जिंकली सलग नववी ट्वेंटी-२० मालिका! अभिषेक, सूर्यकुमारच्या वादळासमोर न्यूझीलंडचा पालापाचोळा

Accident News: भीषण अपघात! महामार्गावर दोन बसची समोरासमोर टक्कर; तिघांचा मृत्यू, अनेक जखमी

Indian Video : भारताला स्वातंत्र्य 99 वर्षांच्या करारावर मिळालंय? 2046 मध्ये इंग्रज परत येणार? वादग्रस्त व्हिडिओतील वक्तव्य कितपत खरं

Latest Marathi news Update : देश-विदेशातील दिवसभरातील घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT