सरकारने उद्योगांशी ‘मैत्रीचे संबंध’ ठेवणे गरजेचे : पी. पी. बरदशकर
इंडियन केमिकल कौन्सिलतर्फे कंपनी सुरक्षा व पर्यावरण कार्यशाळा
रोहा, ता. ४ (बातमीदार) ः रोहा आणि महाड एमआयडीसीतील अनेक कारखाने मागील काही वर्षांत महाराष्ट्रातून बाहेर जात आहेत. राज्यातील रासायनिक उद्योगांचे गुजरातकडे स्थलांतर वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने कारखानदारांशी मैत्रीचे संबंध ठेवणे अत्यावश्यक झाले आहे, असे स्पष्ट मत रोहा इंडस्ट्रिअल असोसिएशनचे अध्यक्ष पी. पी. बरदशकर यांनी व्यक्त केले. धाटाव येथे इंडियन केमिकल कौन्सिलतर्फे आयोजित ‘कंपनी सुरक्षा व पर्यावरण कार्यशाळेत’ ते बोलत होते.
बरदशकर म्हणाले की, एखादा अपघात झाला तर कामगाराची चूक असतानाही संपूर्ण जबाबदारी मालकावर टाकली जाते. त्यामुळे उद्योगपतींमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे. ज्या राज्यात शासन, महामंडळे आणि स्थानिक यंत्रणा उद्योगांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहतात, तेथेच उद्योग टिकतात. गुजरातमध्ये कंपन्यांना कोणताही राजकीय किंवा स्थानिक त्रास नसल्याने रासायनिक उद्योगांची मोठी वाढ झाली आहे, असे त्यांनी सांगितले. २०२० मध्ये महाराष्ट्रातील केमिकल उत्पादनाचा वाटा २० टक्के तर गुजरातचा ४० टक्के होता. ही स्थिती सुधारायची असेल तर सरकारने उद्योगांसोबत संवाद, विश्वास आणि सहकार्याची नीती स्वीकारली पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. उद्योग क्षेत्र बळकट झाल्यास रोजगारनिर्मितीसह राज्याच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल, असेही त्यांनी सांगितले. कार्यशाळेत उद्योगातील सुरक्षा, पर्यावरण संरक्षण, कामगार प्रशिक्षण आणि कायदेशीर जबाबदाऱ्या याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. धाटाव एमआयडीसीतील विविध कंपन्यांचे व्यवस्थापक, पर्यावरण अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.