मुंबई

कात्रीने मानवतेचा चेहरा उजळवणारा अवलिया - रविंद्र बिरारी

CD

कात्रीतून घडवली मानवसेवा
रवींद्र बिरारींची विलक्षण सेवा
टिटवाळा, ता. ९ (वार्ताहर) : समाजासाठी काम करायचे असेल, तर खिशात पैसा असावा, अशी धारणा आपण सहज करतो, पण समाजकार्यासाठी पैसा नाही, तर प्रामाणिक इच्छाशक्ती हवी, हे टिटवाळा येथील रवींद्र बिरारी यांनी कृतीतून सिद्ध करून दाखविले आहे. त्यांनी त्यांच्या कात्रीने अनेक मनोरुग्ण, भिकारी व्यक्तींचे रुपडे पालटले आहे.
रेल्वेस्थानकावर गाडीची वाट पाहत उभे असताना बिरारी यांना अनेक मनोरुग्ण, भिकारी, अंध व अपंग व्यक्तींचे वाढलेले केस-दाढी पाहायला मिळायचे. त्यांच्या अवस्थेने बिरारी अस्वस्थ होत होते. त्यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे, अशी मनात कल्पना आली आणि बिरारी यांनी या सगळ्यांची मोफत केस-दाढी करण्याची सेवा सुरू केली. त्यांनी दर महिन्यातील दोन दिवस काढून ठाणे ते बदलापूर या मध्य रेल्वे परिसरातील गरजू, भिकारी, मनोरुग्ण, अंध, अपंग व्यक्तींचे निःशुल्क केस-दाढी करणे सुरू केले.
दाढी-केस काढल्यानंतर चेहरा आरशात पाहून त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारे हसू हेच बिरारी यांचे सर्वात मोठे समाधान बनते.

पाच हजारांहून अधिकांची सेवा
आजपर्यंत मुंबई आणि परिसरातील पाच हजारांहून अधिक निराधार, आर्थिकदृष्ट्या कमकुवत, भिकारी किंवा मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तींना बिरारी यांनी नव्या चेहऱ्याचा आणि नव्या जीवनदृष्टीचा अनुभव दिला आहे. त्याशिवाय बिरारी हे आदिवासी पाड्यांमध्ये मुलांना शैक्षणिक साहित्य, धान्य, स्वच्छतेचे साहित्य देणे, स्थानक परिसरात राहणाऱ्या वृद्ध, अपंग किंवा मानसिक अडचणीत असलेल्या लोकांना मदतीचा हात देणे हे कार्य गेली अनेक वर्षे सातत्याने करत आहेत.

मनोरुग्णांकडून जीवघेणे हल्ले
हे कार्य करत असताना बिरारी यांच्यावर अनेकदा मनोरुग्णांकडून जीवघेणे हल्ले झाले, तर एकदा जंतुसंसर्ग झालेल्या व्यक्तीचे केस कापत असताना त्यांना संसर्ग झाल्याने बिरारी यांची तब्येत खालावली आणि १० किलो वजन कमी झाले. तरीही त्यांनी सेवा थांबवली नाही.

‘सोशल बार्बर’ म्हणून प्रसिद्ध
भांडुप येथे बिरारी यांचा स्वतःचा हेअर सलून असून, ते ‘सोशल बार्बर’ म्हणून प्रसिद्ध आहेत. रोजच्या धकाधकीच्या जीवनातही ते समाजासाठी वेळ काढतात. त्यांच्या सेवाभावामुळे सर्वच स्तरांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या कार्याबादाद्ल त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले असून, दिवंगत अभिनेते विक्रम गोखले, सिंधुताई सकपाळ, तृतीयपंथी समाजसेविका गौरी सावंत, अण्णा हजारे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अभिजित पानसे यांसारख्या अनेक दिग्गज मंडळींनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Alert : राज्यात थंडीची लाट कायम, 'या' १५ जिल्ह्यांना येलो अलर्ट; जाणून घ्या तुमच्या भागांत कसे असेल हवामान?

Shah Rukh Khan: धुरंधर लाटेतही शाहरुखची एन्ट्री व्हायरल; ‘पठाण २’चं शूट लवकरच!

Pune Airport : पुणे विमानतळावरील ‘प्रवास’ आता सुसह्य; प्रवासी आनंदले; गोंगाट अन् गर्दीही नाही

Court Action Deputy Collector : नुकसानभरपाई दिली नाही कोर्टाने थेट उपजिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची, संगणक केले जप्त; कारवाईने धावाधाव अन्...

Solapur Politics: 'साेलापुरातील दाेन्ही देशमुख आमदारांची एकी'; मुख्यमंत्री फडणवीसांसमोर मांडले प्रश्‍न, निधी देण्याची ग्वाही..

SCROLL FOR NEXT