मुंबई

अंबरनाथमध्ये तक्रार यंत्रणेवर भर

CD

​अंबरनाथ, ता. १३ (वार्ताहर) : अंबरनाथ नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी लागू असलेल्या आचारसंहितेच्या अंमलबजावणीमध्ये निवडणूक प्रशासन तक्रार यंत्रणेवर अधिक अवलंबून असल्याचे दिसून येत आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी सुरू असलेली रस्त्यांची कामे किंवा आवश्यक परवानगीशिवाय वापरली जाणारी वाहने अशा काही घटना शहरात निदर्शनास येत आहेत.
​न्यायालयीन प्रक्रियेमुळे ही निवडणूक आता २० डिसेंबरला होत आहे. आचारसंहितेचा कालावधी वाढला आहे. या काळात उमेदवारांकडून नियमांचे पालन केले जात असल्याची खात्री करण्यासाठी प्रशासन कार्यरत आहे. ​शहरात आचारसंहिता भंगावर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथके तैनात आहेत. या पथकांनी आत्तापर्यंत केवळ तीन किरकोळ गुन्हे दाखल केले. यामध्ये महिलांना भेटवस्तू वाटप आणि अन्न धान्यवाटप यांचा समावेश आहे.

नियमानुसार कार्यवाही
आचारसंहिता भंगासंदर्भात कारवाई करण्यासाठी प्रशासनाला अधिकृत तक्रार प्राप्त होणे महत्त्वाचे आहे. ज्या तक्रारी आल्या आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल करत आहोत. जिथे तक्रार असेल, तिथे नियमानुसार कार्यवाही केली जाईल. मात्र, जी गोष्ट आमच्यापर्यंत (तक्रारीद्वारे) आली नाही, तिच्यावर कारवाई करणे प्रशासनाला शक्य होत नाही, असे निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरही लाचेचा मोह! नायब तहसीलदार ४० हजारांची लाच घेताना कार्यालयातच रंगेहाथ पकडला, नोटांना लावली होती पावडर अन्‌...

Onion Bhavan: शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक पाऊल! जगातील पहिले ‘राष्ट्रीय कांदा भवन’ महाराष्ट्रात होणार; पण कुठे? जाणून घ्या...

Railway Jewellery Theft : रेल्वे प्रवाशांना मदतीचा बहाणा; ४० लाखांचे हिरेजडित दागिने लंपास करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड!

Sai Jadhav : महाराष्ट्राच्या लेकीने घडवला इतिहास!, सई जाधव ठरली ९३ वर्षानंतर 'टेरिटोरियल आर्मी'ची पहिली महिला ‘लेफ्टनंट’

IND vs SA: शेवटच्या दोन T20I सामन्यांसाठी टीम इंडियात दोन वर्षांनी या अष्टपैलूचं पुनरागमन! अक्षर पटेलची घेणार जागा

SCROLL FOR NEXT