शालेय जीवनातील टप्पा महत्त्वाचा ः राजेश्वर दाभाडे
समन्वय प्रतिष्ठानतर्फे करिअर मार्गदर्शन शिबिर उत्साहात
कल्याण, ता. १७ (वार्ताहर) : विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणातच करिअरची दिशा ठरवून जिद्द आणि चिकाटीने अभ्यास केल्यास यशाच्या शिखरावर सहज पोहोचता येते. त्याकरिता शालेय जीवनातील हाच टप्पा महत्त्वाचा असून, शिक्षणाची गोडी निर्माण करून नियमित अभ्यास केला पाहिजे, असा संदेश करिअर मार्गदर्शक तज्ज्ञ राजेश्वर दाभाडे यांनी दिला.
चिकणघर येथील सद्गुरु वामनराव पै. सभागृह येथे दहावी, बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार आणि करिअर मार्गदर्शन शिबिर पार पडले. त्या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दाभाडे बोलत होते. तर विद्यार्थ्यांनी नित्यनियमाने अभ्यास करणे क्रमप्राप्त असून, भविष्यात तुम्हाला ज्या क्षेत्रात नोकरी वा व्यवसाय करण्याची इच्छा आहे, त्याची सुरुवात आजपासूनच करण्याचा सल्ला सामाजिक कार्यकर्ते महेश जाधव यांनी दिला. या कार्यक्रमात दहावीतील २५ गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे संस्थापक ॲड. जनार्दन टावरे, संतोष खेताडे, किरण शिरसाट, मंगेश टेंबे, सुहास मोहळ, शंकर पाटील, दिनबंधू स्वराज आदींसह विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संखेने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.