गुलजारी नदीवर वनराई बंधारा
खाणीव येथे ग्रामस्थांचे श्रमदान
कासा, ता. २७ (बातमीदार) : पाणी अडवा, पाणी जिरवा या जलसंवर्धन उपक्रमांतर्गत चारोटी कोल्हाण जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या वतीने व महालक्ष्मी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने गुलजारी नदीवर खाणीव येथे शनिवारी (ता. २७) श्रमदानातून बंधारा बांधण्यात आला. गट शिक्षणाधिकारी संजय वाघ यांच्या नेतृत्वाखाली हे काम करण्यात आले.
उपक्रमात चारोटी-कोल्हाण परिसरातील शिक्षक-शिक्षिका, ग्रामविकास अधिकारी, सरपंच तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रमदानातून बंधारा उभारून पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत जिरवण्यावर भर देण्यात आला.
पाणी अडवा, पाणी जिरवाअंतर्गत सध्या विविध ठिकाणी वनराई बंधारे उभारले जात असून, यामुळे पाण्याचे स्रोत बळकट होणार आहेत. तसेच भाजीपाला लागवड, शेतीसाठी पाणी उपलब्धता वाढण्यास मदत होणार असून, गुरांसाठीही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास हातभार लागणार आहे. जलसंवर्धनाचे महत्त्व या वेळी उपस्थितांना समजावून सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.