‘चला परत निसर्गाकडे’ शिबिर
पनवेल, ता. १९ (बातमीदार) : संवेदना चॅरिटेबल संस्था, पनवेल यांच्या वतीने ११ जानेवारी २०२६ रोजी आगरी समाज हॉल, पनवेल येथे ‘चला परत निसर्गाकडे’ या एकदिवसीय राज्यस्तरीय शिबिराचे आयोजन पार पडले. राज्यभरातून सुमारे ४५० शेतकरी, नागरिक व निसर्गप्रेमी उपस्थित होते.
शिबिराचा मुख्य उद्देश रासायनिक शेतीपासून मुक्त होऊन सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती पद्धतीचा अभ्यास, प्रसार आणि पोषक, विषमुक्त अन्ननिर्मिती मार्गदर्शन करणे होता. शेतकरी कुटुंबाला संपूर्ण अन्न व आर्थिक स्वावलंबन देणारी समृद्ध शेती कशी उभी करता येईल, तसेच शहरी ग्राहकांना विषमुक्त अन्न उपलब्ध करून देण्यासाठी परसबाग, छतशेती यांना प्रोत्साहन देण्यावर मार्गदर्शन केले गेले.
चौकट
नैसर्गिक शेतीचे महत्त्व
डॉ. सुभाष पाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी-ग्राहक यांच्यात थेट विषमुक्त व पोषक अन्नपुरवठ्याची समृद्ध व्यवस्था निर्माण करण्यावर भर देण्यात आला. या नैसर्गिक शेती पद्धतीमुळे शेतकरी आत्मनिर्भर बनतात आणि आरोग्यदायी समाजनिर्मितीला चालना मिळते, ज्यामुळे शेतकरी व ग्राहक दोघांनाही शाश्वत आणि सुरक्षित भविष्यासाठी नवी दिशा प्राप्त होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.