मुंबई

वाळीत टाकणाऱ्या ३३ जणांवर गुन्हा

CD

वाळीत टाकणाऱ्या ३३ जणांवर गुन्हा
रेवदंडा, ता.१२ (बातमीदार) ः अलिबाग तालुक्यातील खैरवाडी-रामराजमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबाला सप्टेंबर २०२१ पासून वाळीत टाकण्यात आले होते. या प्रकरणात रेवदंडा पोलिसांनी ३३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
अलिबाग तालुक्यातील थळवायशेत गावातील धर्मा गडखल यांच्या मुलाचे २०१९ मध्ये आजारपणामुळे मृत्यू झाला होता. देव देवस्कीतून करणी केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा गैरसमज पसरवून २०२१ ला गावातील समाज मंदिरात सभेत साठ हजारांची मागणी करण्यात आली होती. पण फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्याने त्याच रागातून गावकीचे पंच ग्रामस्थांनी कुटुंबाला वाळीत टाकण्याचा निर्णय घेतला. तसेच कुटुंबाबरोबर संबंध ठेवणाऱ्यांना पाच हजारांचा दंड तसेच बोलताना कोणी पकडून दिल्यास एक हजारांचे बक्षिस ठेवले होते. तसेच गावातील समाज मंदिरात प्रवेशबंदी करण्यात आली. या प्रकरणी तुकाराम दरोडा (वय ३९ रा. खैरवाडी-रामराज) यांनी फिर्याद देताच खैरवाडी-रामराजमधील ३३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Leopard Safety Tips : अचानक बिबट्या दिसला तर काय करायचं..? ; सुरक्षित राहण्यासाठी पाळा वनविभागाच्या 'या' सूचना

"सचिन पिळगावकर यांचं इंडस्ट्रीतील योगदान प्रचंड" ट्रोलिंगवर क्षितिज पटवर्धनने ओढले ताशेरे; "त्यांचे सिनेमे.."

Pakistan: असीम मुनीर यांच्या हातात पाकिस्तानचा कंट्रोल; अण्वस्त्र अन् तिन्ही सशस्त्र दलांचे मिळाले अधिकार

Latest Marathi News Live Update: वर्सोव्यात २२ हजारांहून अधिक बोगस मतदार

Zudio Sale : झुडिओ Black Friday Sale उद्यापासून सुरू; काय असतील डिस्काउंट ऑफर? कोणत्या वस्तू किती स्वस्त मिळणार..सगळं एका क्लिकवर पाहा

SCROLL FOR NEXT