file photo 
मुंबई

लोकलमधून प्रवास करणार्‍या मुंबईकरांच्‍या जीवाची काही किंमत आहे की नाही...

सकाळ वृत्तसेवा

ठाणे/कळवा  ः मुंब्रयाहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलच्या दरवाजात लटकून प्रवास करणारे तीन प्रवासी गाडीतून पडले. त्यातील एकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता.5) घडली. सकाळी नऊ वाजून 28 मिनिटांच्या लोकलमध्ये हे तिघेजण प्रवास करत होते. 10 वाजण्याच्या सुमारास मुंब्रा ते कळवादरम्यान खारीगाव रेल्वे फाटकाजवळ ही घटना घडली. या घटनेत हाजी रईस अहमद (53, रा. मुंब्रा, मूळ उत्तर प्रदेश, बरेली) या प्रवाशाचा मृत्यू झाला; तर इम्तियाज गुलाम हैदर शेख (42) आणि अबू ओसामा (23), दोघेही रा. अमृतनगर, कौसा, मुंब्रा हे जखमी झाले आहेत.


सकाळच्या सत्रात मुंब्रा रेल्वेस्थानकावरून प्रचंड गर्दीत मुंबईकरता लोकल ट्रेन पकडणे म्हणजे मोठे दिव्य असते. बुधवारीदेखील लोकलला तुडुंब गर्दी असल्याने अनेक प्रवासी लोकलच्या दरवाजावर लटकून प्रवास करीत होते. या गर्दीमुळे तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघे जण लोकलमधून पडल्याच्या घटना मुंब्रा ते कळवा स्थानकादरम्यान घडल्या.

या घटनेतंर या तिघांनाही तत्काळ कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. मात्र, डोक्‍याला गंभीर दुखापत झाल्याने हाजी रईस अहमद याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला; तर इम्तियाज शेख याच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली असून अबू ओसामा याच्यादेखील डोक्‍याला आणि हातापायांना गंभीर दुखापत झाली आहे. मृत्यू झालेले हाजी अहमद हे मित्राच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी उत्तर प्रदेशातून मुंबईला आले होते, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, या घटनांची नोंद ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. 

दरवर्षी तीन हजार बळी 
लोकलमधून पडून दरवर्षी जवळपास तीन हजार लोक मृत्युमुखी पडतात. लोकलमधील गर्दीमुळे अनेक जण जायबंदी होतात. दोन महिन्यांपूर्वीच चार्मी पासद या तरुणीचा; तसेच अजय निकाते या तरुणाचा डोंबिवली-कोपर स्थानकादरम्यान गर्दीमुळे तोल जाऊन मृत्यू झाला होता. याशिवाय नावेद शेख, इमरान शेख, प्रदीप प्रजापती आणि शाईजा परवेज सिद्दीकी हे मुंब्रा ते कळवादरम्यान प्रवास करताना याआधी जखमी झाले. तेव्हा, लोकलच्या फेऱ्यासह डबे वाढवणे; तसेच वर्दळीच्या कालावधीत मेल-एक्‍स्प्रेसमधून लोकलच्या प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा दिली पाहिजे, आदी मागण्या रेल्वे प्रवासी संघटनांकडून केली जात आहे. 

दरवर्षी जवळपास तीन हजार प्रवासी लोकलमधून पडून मृत्युमुखी पडतात. आज पुन्हा एकदा एका प्रवाशाचा जीव गेला आहे. मृत्यू कमी व्हायचे असतील तर रेल्वे प्रशासनाने या समस्या सोडवण्यासाठी गंभीर होणे गरजेचे आहे. 
- नंदकुमार देशमुख, अध्यक्ष रेल्वे प्रवासी संघटना, ठाणे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरही लाचेचा मोह! नायब तहसीलदार ४० हजारांची लाच घेताना कार्यालयातच रंगेहाथ पकडला, नोटांना लावली होती पावडर अन्‌...

Onion Bhavan: शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक पाऊल! जगातील पहिले ‘राष्ट्रीय कांदा भवन’ महाराष्ट्रात होणार; पण कुठे? जाणून घ्या...

Railway Jewellery Theft : रेल्वे प्रवाशांना मदतीचा बहाणा; ४० लाखांचे हिरेजडित दागिने लंपास करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड!

Sai Jadhav : महाराष्ट्राच्या लेकीने घडवला इतिहास!, सई जाधव ठरली ९३ वर्षानंतर 'टेरिटोरियल आर्मी'ची पहिली महिला ‘लेफ्टनंट’

IND vs SA: शेवटच्या दोन T20I सामन्यांसाठी टीम इंडियात दोन वर्षांनी या अष्टपैलूचं पुनरागमन! अक्षर पटेलची घेणार जागा

SCROLL FOR NEXT