मुंबई

उपासमारीला वैतागले! आणि ते सायकलवरून उत्तरप्रेदशात निघाले...

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई: पनवेल येथून सायकलवरुन उत्तरप्रदेश येथे जाणाऱ्या 57 व्यक्तींची तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी पहाटे धरपकड केली. पोलिसांनी या सर्वांवर तसेच त्यांना सायकल विकणाऱ्या 3 दुकानदारांवर गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी या सर्वांना 15 दिवसांचे अन्नधान्य देऊन ते रहात असलेल्या ठिकाणी परत पाठवून दिले आहे.

पोलिसांनी पकडलेल्या 57 पैकी बहुतांश व्यक्ती पनवेलच्या बम्बई पाडा येथील तर काही तुर्भे इंदिरानगर भागात राहणारे आहेत. हे सर्वजण उत्तर प्रदेशमधील असून सध्या ते नवी मुंबई-पनवेल भागात विविध ठिकाणी काम करुन आपला उदरनिर्वाह करत आहेत. लॉकडाऊनमुळे मागील दिड महिन्यांपासून कामधंदे बंद झाल्याने त्यांची उपासमार सुरु होती. त्यामुळे या सर्व कामगारांनी एकत्र येऊन पनवेलच्या तीन सायकल दुकानदारांकडून सायकल खरेदी करून बुधवारी पहाटेच्या सुमारास हे सर्वजण सायकलवरुन पनवेल येथून उत्तरप्रदेश येथे निघाले होते.

या 57 जणांवर शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी तसेच त्यांना सायकल देणाऱ्या 3 दुकानदारांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : सीएसकेची संथ सुरूवात; भुवनेश्वरनं दिला पहिला धक्का

Buss Accident : उत्तर प्रदेशमध्ये भीषण बस अपघात; ट्रकच्या वेगाने बस कापून निघाली, सात जणांचा मृत्यू

T20 WC 2024 India Squad : विकेटकिपर निवडणं UPSC क्रॅक करण्यापेक्षाही झालं अवघड; 'यांनी' निवडसमितीची डोकेदुखी वाढवली

Uttarakhand Forest Fire : उत्तराखंडमध्ये जंगलाला भीषण आग! वणव्यांमुळे ३३.३४ हेक्टरवरील झाडे जळून खाक

Latest Marathi News Live Update : हनुमानाची भूमी काँग्रेसला माफ करणार नाही- पीएम मोदी

SCROLL FOR NEXT