मुंबई

सोनियाजी फोन करुन विचारतात काम कसं सुरुय: उद्धव ठाकरे

पूजा विचारे

मुंबईः  गुरुवारी महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त पुस्तक प्रकाशन सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात सोनिया गांधींनी विचारलेल्या प्रश्नावर काय उत्तर दिलं. त्याबाबतचा खुलासा केला आहे. 

सोनियाजी फोन करुन विचारतात काम कसं सुरु आहे, याची विचारपूस त्या करत असतात, असं उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमात सांगितलं. तसंच हमारे लोग सताते तो नहीं ना?, असंही त्या विचारतात हे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सोनिया गांधी यांच्या प्रश्नाला मुख्यमंत्री काय उत्तर देतात. हे मुख्यमंत्र्यांनी सर्वांना या कार्यक्रमात  सांगितलं आहे. सोनियाजींनी हे विचारल्यावर मी तिथे काँग्रेसची बाजू लावून धरतो आणि राष्ट्रवादीपेक्षा जास्त नाही, असं मी त्यांना सांगितो, असं उद्धव ठाकरे म्हणालेत. 

नैसर्गिक आपत्तीत राजकारण केलं जातंय पण ते क्लेशकारक आहे. कँबिनेट काय असतं ते मला मुख्यमंत्री पदावर आल्यानंतर कळत आहे. मला सर्वाचं सहकार्य लाभत असून यामागे शरद पवार आणि सोनिया गांधी यांचे मार्गदर्शन महत्त्वाचं असल्याचंही ते म्हणालेत. 

वर्षभरापूर्वी जनतेनं दिलेल्या आशीर्वादामुळे तीन पक्षांचे सरकार स्थापन झाले. वर्षभरात या सरकारनं नैसर्गिक संकटांना तोंड दिलं. तसंच राज्यातल्या जनतेच्या पाठीशी हे सरकार ठामपणे उभे राहिले. नैसर्गिक आपत्तीत बळीराजाला सावरतानाच कोरोनाच्या संकटात सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी भक्कमपणे सरकारकडून काम केलं जात आहे. कोरोनाकाळात रुग्णसंख्या असो की मृत्यूसंख्या त्यात राज्य सरकारनं कोणत्याही लपवाछपवी केलेली नसल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. 

पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, वर्षापूर्वी  जनतेच्या विश्वासाच्या बळावर राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर कितीही संकटं आली तरी महाराष्ट्र घाबरला नाही, घाबरणार नाही आणि जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नसल्याचंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

Uddhav Thackeray Phone Call Sonia Gandhi for Government

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Decision about World Cup: भारत विश्वविजेता झाल्याच्या पाच दिवसांतच ‘ICC’ने विश्वचषकाबाबत घेतला मोठा निर्णय!

India Pakistan Conflict: पाकिस्तान खरंच अणुचाचण्या करतंय का? संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मांडली भारताची भूमिका

MahaBiz Summit : राज्यातील उद्योजकांना मिळणार जागतिक संधींचे व्यासपीठ ‘जीएमबीएफ’ व ‘एमईडीसी’ यांच्या संयुक्त विद्यमाने दुबईत ‘महाबिझ’चे आयोजन

Mahar Vatan Land Scam : मुंढवा येथील जमीन गैरव्यवहारानंतर खळबळ; 'महार वतन जमिनी बळकावणाऱ्यांची सीबीआय चौकशी करा' महार वतन परिषदेची मागणी

Pune Traffic : सिंहगड रस्त्यावरील उड्डाण पुलावर रिक्षा-कारचा तिहेरी अपघात! मोठी वाहतूक कोंडी, नागरिक हैराण

SCROLL FOR NEXT