मुंबई

मुंबई विद्यापिठाच्या आयडॉल अभ्यासक्रमाला युजीसीची मान्यता; प्रथम वर्षाचे प्रवेश लवकर

तेजस वाघमारे

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेला (आयडॉल) विद्यापीठ अनुदान आयॊगाच्या डिस्टन्स एज्युकेशन ब्युरो (युजीसी-डीईबी) ने शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी मान्यता दिली आहे. त्यानुसार आयडॉल प्रथम वर्षाचे प्रवेश लवकरच सुरु करणार आहे.

युजीसी-डीईबीने शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी भारतातील 33 विद्यापीठांना प्रथम वर्षाचे प्रवेश सुरु करण्यास मान्यता दिल्याचे पत्र 12 ऑक्टोबर 2020 रोजी युजीसीच्या संकेतस्थळावर प्रदर्शित झाले. या पत्रानुसार  मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेलाही शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी प्रवेश करण्यास मान्यता मिळाली आहे. यानुसार आयडॉल प्रथम वर्ष बीए, बीकॉम व बीएससी आयटी या पदवीस्तरावरील अभ्यासक्रमासाठी तर भाग 1 एमए, एमए शिक्षणशास्त्र, एमकॉम, एमएस्सी गणित, एमएस्सी आयटी व एमसीए या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रवेश लवकरच सुरु केले जाणार आहेत.

युजीसी-डीईबीने  मागील वर्षी आयडॉलच्या 15 अभ्यासक्रमाला मान्यता दिली होती. यानुसार मागील वर्षी जुलैच्या सत्रामध्ये 67 हजार 237 तर जानेवारी सत्रामध्ये 920 विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले होते. 2020-21 या  शैक्षणिक वर्षात आतापर्यंत पदवीस्तरावरील द्वितीय,  तृतीय आणि पदव्युत्तर स्तरावरील भाग 2 साठी 25,697 विद्यार्थ्यांनी  प्रवेश घेतला आहे. या प्रवेशाची अंतिम 20 ऑक्टोबर 2020 आहे.

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराऐवजी हवनाकडे वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: विरार - दादर लोकल ट्रेनमध्ये माथेफिरूचा धुमाकूळ; रेल्वे प्रवासी महिलांची सुरक्षा वाऱ्यावर

SCROLL FOR NEXT