मुंबई

शिवसेना भाजपाला झटका देणार? दिवाळीनंतर राजकीय फटाके फुटणार

भाजपमधील काही नाराज उत्तर भारतीय नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती आहे.

सकाळ वृत्तसेवा

- सुशांत सावंत

मुंबई: पुढच्यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात होणारी मुंबई महापालिका निवडणूक (BMC Election) जिंकण्यासाठी भाजपाने आतापासूनच मोर्चेबांधणी सुरु केली आहे. भाजपा (Bjp) मागच्या काही महिन्यांपासून अन्य पक्षातील प्रभावी नेत्यांना आपल्या पक्षात स्थान देत आहे. मुंबई जिंकण्यासाठी भाजपाला मराठी मतांबरोबर (Marathi voters) उत्तर भारतीय मतांची (north indian votes) सुद्धा आवश्यकता आहे. त्यासाठी भाजपाने मध्यंतरी कृपाशंकर सिंह यांना पक्षात प्रवेश दिला. ते पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते आहेत.

उत्तर भारतीयांची एकगठ्ठा मत मिळवण्याची भाजपाची रणनीती आहे. मागच्या अनेक वर्षांपासून मुंबई महापालिकेत सत्तेवर असलेल्या शिवसेनेने सुद्धा आता तशीच रणनीती अवलंबली आहे. दोन दिवसांपूर्वी शिवसेना नेते आणि नगरसेवक यशवंत जाधव यांनी लवकरच भाजपचे १५ ते २० नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा त्यांनी दावा केला. मुंबईतील भाजप नगरसेवक पक्षात नाराज असल्याचे त्यांनी सांगितले.

आता भाजपमधील नाराज उत्तर भारतीय नेत्यांवर आता शिवसेनेचा डोळा आहे. भाजपमधील काही नाराज उत्तर भारतीय नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती आहे. दिवाळी नंतर शिवसेना राजकीय फटाके फोडण्याची शक्यता आहे.

भाजपमध्ये नव्याने आलेल्या उत्तर भारतीय नेत्यांमुळे भाजपमधील जुने उत्तर भारतीय नेते नाराज आहेत. या नाराज उत्तर भारतीय नेत्यांशी शिवसेनेचे नेते संपर्कात असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. भाजपमध्ये नव्याने आलेल्या उत्तर भारतीय नेत्यांमुळे  अडगळीत पडल्याची भावना काही उत्तर भारतीय नेत्यांची आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT