मुंबई

भाज्यांचे भाव कडाडले! कोरोनाने आधीच आर्थिक संकटात असलेल्या सर्वसामान्यांचे हाल सुरूच

प्रसाद जोशी

वसई ः कोरोनाकाळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, वेतनात कपात लागू झाली. असे असताना दररोज आहारातील भाज्यांचे भावही गगनाला भिडले असल्याने जगायचे कसे आणि खायचे तरी काय असा प्रश्न सर्वसामान्यांना सतावू लागला आहे. बहुतेक भाज्यांनी किलोला शंभरी गाठली असून हिरवा वाटाणा तर 400 रुपये किलो इतका महागला आहे. 

वसई, नालासोपारा, विरार व नायगाव शहरात मध्यमवर्गीय व गरीब नागरिकांचे प्रमाण अधिक आहे. बैठी घरे, चाळीत राहण्याचे प्रमाण जास्त आहे. मजुरीवर गुजराण करणारी कुटूंबे अधिक आहेत. शाकाहारी आहारात वापरल्या जाणाऱ्या भाज्यांकडे जास्त कल असलेल्या नागरिकांना आता भाज्या घेणे देखील परवडत नाही. गवार, फ्लॉवर, फरसबी यांसारख्या भाज्या 160 रुपये किलो, भेंडी 100 रुपये किलो झाली असून कोथिंबीरची एक जुडी 80 ते 100 इतक्‍या भावाने विकली जात आहे. तसेच कोबी 160 रुपये किलो झाली आहे. लिंबाचा भाव देखील वधारला आहे. 3 लिंबू 20 रुपयांना विकले जात आहेत. शेवग्याच्या शेंगा 30 रुपयांना 3 असून, सिमला मिरची 80 रुपये किलो दराने विक ली जात आहे. आठ दिवसांपूर्वी हिरवा वाटाणा 200 रुपयांनी विकला जात होता त्याचा दर आता दुप्पट झाला आहे. 

त्यामानाने काकडी 80 तर टोमॅटो 60 रुपये असल्याने त्या खरेदीकडे ग्राहकांचा कल दिसून येतो. कांदा, बटाटा देखील पन्नास रुपये किलोने विकला जात आहे. कोरोना महामारीत लॉकडाऊन जरी हळूहळू शिथिल केला जात असला तरी मात्र बाजारात अनेक वस्तूंच्या दरात वाढ होत असल्याने त्यात सर्वसामान्य नागरिक होरपळ होत आहे. 

कोरोनाकाळात माझी नोकरी गेली. कुटुंबाची जबाबदारी आहे. पूर्वी भाज्या स्वस्त होत्या मात्र आता बाजारात जाताच कालचा भाव आज अजून वाढलेला दिसतो. रोजच्या जेवणात वापरल्या जाणाऱ्या भाज्या घेणे देखील परवडत नाही. 
वनिता जाधव -
गृहिणी ,वसई. 

वाहतुकीचा परिणाम, इंधनाचे वाढलेले दर तसेच मागणीनुसार भाजीपाला पुरवठा होत नाही. कोरोनामुळे अनेक अडचणी येत आहेत त्यामुळे भाज्यांचे दर देखील वाढले आहेत असे भाजीविक्रेत्यांचे म्हणणे आहे. 

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

Brazil Flood: ब्राझीलमध्ये पूर आणि पावसामुळे विध्वंस, 57 हून अधिक मृत्यू आणि हजारो बेपत्ता

Kshitij Zarapkar: अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन

Latest Marathi News Live Update : इस्त्रायलमध्ये घुमला, 'अब की बार 400 पार'चा नारा

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

SCROLL FOR NEXT