मुंबई

विद्यार्थी पालक समन्वय समितीने घेतली राज ठाकरेंची भेट; अकरावी प्रवेशाचा तीढा सोडवण्याची मागणी

तुषार सोनवणे

मुंबई - विद्यार्थी पालक समन्वय समितीने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आहे. मुंबईतील कृष्णकुंज या निवासस्थानी त्यांनी भेट घेतली. गेल्या अनेक महिण्यांपासून अकरावीच्या प्रवेशाचा तीढा सूटलेला नाही. तसेच खासगी कोंचिंग क्लासेसच्या शिक्षकांचा प्रश्नही ऐरणीवर आहे. त्यामुळे या समितीने राज ठाकरेंची भेट घेतल्याचे समजते.

मराठा आरक्षणाला दोन महिण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. तेव्हापासून राज्यातील लाखो अकरावीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले आहेत. हा मुद्दा लवकरात लवकर कसा मार्गी लावता येईल या मागणीसाठी विद्यार्थी पालक समन्वय समितीने राज ठाकरे यांच्या कृष्णकुंजवर धाव घेतली आहे. नेमके यातून मार्ग काय काढावा यासाठी सरकारला जागं करावं म्हणून राज ठाकरेंना समितीने साद घातली आहे. राज्यातील काही विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. अनेकांचे ते झालेले नाहीत. ही प्रक्रिया मराठा आरक्षश्रणामुळे अडकले आहेत. राज्यातील रखडलेल्या प्रवेश प्रक्रियेसोबतच महाविद्यालयांना केलेल्या भरमसाठ फीवाढीमुळे पालक हैराण झाले आहेत.

यासोबतच राज्यातील खासगी कोंचिंग क्लासेसच्या मालक आणि शिक्षकांनीही राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. गेल्या अनेक महिण्यांपासून खासगी कोचिंग बंद असल्याने शिक्षकांचे आतोनात हाल होत आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आहे. राज्यातील खासगी कोचिंग क्लासेस लवकरात लवकर सुरू करावेत या मागणीसाठी त्यांचेही शिष्टमंडळ राज ठाकरेंच्या भेटीला आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT