मुंबई

तु्म्ही कोणत्याही व्हाट्सअप ग्रृपचे अॅडमिन असाल तर, वाचा ही बातमी!

सकाळ वृत्तसेवा


मुंबई : समाज माध्यमांवरून फॉरवर्ड केल्या जाणाऱ्या कोरोनाशी संबंधित दिशाभूल करणाऱ्या व आक्षेपार्ह पोस्टसाठी व्हॉट्सॲप ग्रुपच्या ॲडमिनला सरसकट जबाबदार धरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याविरोधात भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका केली आहे.

राज्य सरकारने 23 मे रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार कोरोनाशी संबंधित बोगस, चुकीच्या आणि सरकारविरोधात संभ्रम निर्माण करणाऱ्या पोस्ट व्हॉट्सॲप चॅटमध्ये टाकल्यास संबंधित ग्रुप ॲडमिनवर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे अनेक व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फक्त ॲडमिनना पोस्ट टाकण्याचा अधिकार देण्यात आला आहे. पोलिसांचा हा आदेश मनमानी आणि बेकायदा आहे. ही अघोषित सेन्सॉरशिप असून, निरपराध व्यक्तींसाठी अन्यायकारक असल्याचा दावा दक्षिण मुंबईतील आमदार लोढा यांनी जनहित याचिकेत केला आहे. सरकारने जनतेची टीकाही सहन करायला हवी, त्यांनी नमूद केले आहे. 

आमदार असलेले लोढा यांनी संबंधित आदेश रद्द करण्याची मागणी उच्च न्यायालयाकडे केली आहे. राज्य सरकारच्या आदेशामुळे घटनेतील अनुच्छेद 19 (1) (भाषा स्वातंत्र्य), 14 (समानता) आणि 21 (जगण्याचा अधिकार) यांना बाधा येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या याचिकेवर शुक्रवारी (ता. 29) सुनावणी होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 World Cup: वैभव सूर्यवंशीच्या पावणे दोनशे धावा, कर्णधार आयुषचीही फिफ्टी! फायनलमध्ये भारताच्या ४०० धावा पार...

Income Tax Rule : ऑडिटमध्ये उशीर झाला तर थेट 75,000 रुपयांचा दंड! काय आहे नवीन नियम?

Latest Marathi News Live Update : भरधाव इन्होवा कार डिव्हायडरला धडकल्याने अपघात

Pargaon News : टाव्हरेवाडीच्या दोन भावांच्या गोठ्यातील संकरीत कालवडींचा राज्यात गवगवा; विविध कृषि प्रदर्शनात ठरत आहे अव्व्ल

Aircraft Technical Faults India : वर्षभरात किती विमानांमध्ये उद्भवला बिघाड? ; मंत्री मोहोळ यांनी लोकसभेत आकडाच सांगितला, म्हणाले...

SCROLL FOR NEXT