मुंबई

पीक कर्ज माफी योजना सरसकट का नाही? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल

सुनिता महामुनकर

मुंबई : राज्यातील सुमारे 35 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ न देता पंधरा लाख शेतकऱ्यांनाच कर्ज माफी का केली, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केला आहे. याबाबत येत्या तीन आठवड्यात खुलासा करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

महात्मा ज्योतीराव फुले पीक कर्ज माफी योजना राज्य सरकारने मागील वर्षी जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत 1एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 ( आणि जे सप्टेंबर 2019 पर्यंत परतफेड झाले नसेल) या दरम्यान पीक कर्ज घेतलेल्या दोन लाख रकमेपर्यतचे कर्ज  माफ करण्यात येणार आहे. मात्र सुमारे 35 लाख शेतकरी या योजनेसाठी पात्र असतानाही केवळ 15 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ दिला आहे, असा आरोप जनहित याचिकामार्फत करण्यात आला आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी ही याचिका अॅड. राजेंद्र पै यांच्यामार्फत केली आहे.

 याचिकेवर आज न्या. के. के. तातेड यांच्या खंडपीठापुढे व्हिडीओ कौन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केला होता, मात्र त्यावर समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे याचिका दाखल केली, असे त्यांच्या वतीने सांगण्यात आले.

राज्य सरकारकडून याचिकेला विरोध करण्यात आला. याचिकादारांनी माहिती अधिकाराचा वापर करून याबाबतीत माहिती घ्यावी, असा युक्तिवाद सरकारकडून करण्यात आला.  

याचिकादाराने स्वतःच यावर माहिती मिळवायला हवी होती. मात्र आतापर्यंत किती शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आणि सरकारने सरसकट सर्वासाठी योजना का नाही राबविली, याचा खुलासा दाखल करा, असे निर्देश न्यायालयाने दिले.

---------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: हा व्हिडिओ खास आहे... नातं रक्ताचं नव्हतं, पण... जंगलात वाजली शहनाई, CRPF जवानांनी निभावलं वधूच्या भावाचं कर्तव्य

Ashadhi Wari 2025 : बंधुभेटीच्या सोहळ्याने अवघे वैष्णव भावुक; संत ज्ञानेश्वर महाराज-संत सोपानदेवांच्या भेटीचा सोहळा अनुभवण्यासाठी गर्दी

Satara Crime : धोमच्या चोरीप्रकरणी एकास अटक; नवनाथ दत्त मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास

Public Health Corruption: आरोग्य खात्यात साहित्य खरेदीत गैरव्यवहार; आमदार डाॅ. राहुल पाटील यांचा विधानसभेमध्ये आरोप

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

SCROLL FOR NEXT