मुंबई

मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीची वाट आज होणार मोकळी ?

सकाळवृत्तसेवा

मुंबई - महाराष्ट्रात आता कोरोनाच्या हालचालींसारख्याच राजकीय घडामोडी देखील वेगवान होताना पाहायला मिळतायत. याला कारण ठरतंय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारकी. कालच महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना उद्धव ठाकरेंची राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून नियुक्ती शिफारस करण्यात आलीये.  

अशात आता महाराष्ट्रातील राजकीय हालचालींना वेग आलाय. याला कारण आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेेते प्रवीण दरेकर आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांनी आज दुपारी घेतलेली राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट. या भेटीचं कारण जरी 'पत्रकारांवर होणारे हल्ले ही अघोषित आणीबाणी असल्याने राज्यपालांनी सरकारला निर्देश द्यावेत,ही मागणी असली तरीही मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीबाबत चर्चा झाली असल्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून बोलली जातेय.

राज्यात सध्या कोरोनाचं वादळ घोंगावतंय. अशात महाराष्ट्रासाठी राजकीय अस्थिरता परवडणारी नसल्याचं महाविकास आघाडीचे नेते म्हणतायत. यासाठी महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीसाठी अनुकूल निर्णय घेण्यासाठी राज्यपालांना आग्रह धरणार आहेत. आज संध्याकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री एकनाथ शिंदे आणि बाळासाहेब थोरात हे राज्यपालांना भेटणार आहेत. त्यामुळे आज महाविकास आघाडीच्या शिष्ट मंडळाच्या भेटीनंतर तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीची वाट मोकळी होणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे. 

will CM uddhav thackerays government appointed MLA rout cleared today

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT