मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक, चित्रपट पटकथाकार यशवंत रांजणकर (87) यांचे सोमवारी दुपारी पवई येथील खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. रात्री उशिरा त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, जावई, सून, बहीण व नातवंडे असा परिवार आहे.
हे ही वाचा : कोरोना काळात केलं लग्न पण अवघ्या तीन दिवसातच झालं असं काही...बातमी वाचून तुम्हालाही बसेल धक्का..
यशवंत रांजणकर 10 दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर पवईतील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. उपचारांदरम्यान सोमवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांची 50 हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी अनेक चित्रपटांसाठी कथा, पटकथा आणि संवाद लेखन केले आहे. 'सर्जा ' या चित्रपटाची पटकथा व संवाद रांजणकर यांचे होते. त्यांनी 'शापित' चित्रपटाचे संवाद व 'अर्धांगी' चित्रपटाची पटकथा लिहिली होती. रांजणकर यांनी 'धाकटी सून', 'आई पाहिजे' अशा 10 ते 12 चित्रपटांसाठी कथा, पटकथा, संवाद लेखन केले आहे.
'अर्धांगी' चित्रपटाच्या पटकथेसाठी त्यांना राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. रांजणकर यांच्या 'अपूर्व चित्रलेणी’, व 'वॉल्ट डिस्ने यांचे चरित्र' या पुस्तकांना पुरस्कार मिळाले होते. यशवंत रांजणकर यांनी बँकेत नोकरी केली; तसेच मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे ग्रंथपाल म्हणूनही काम केले. त्यानंतर त्यांनी वृत्तपत्रांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. अलीकडे त्यांनी 'हंस’, 'मोहिनी' या दिवाळी अंकांमधून लेखन केले. मागील वर्षी 'हंस' दिवाळी अंकासाठी त्यांनी संशोधनात्मक मोठा लेख लिहिला होता.
writer Yashwant Ranjankar passes away read detail story
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.