File photo 
नांदेड

नांदेड जिल्ह्यातील रेल्वे प्रवासी जनतेचे हालच

प्रमोद चौधरी

नांदेड : अजूनही सर्वसामान्य प्रवाशांसाठी रेल्वेचा प्रवास सुकर झालेला नाही. आरक्षण केल्याशिवाय रेल्वेद्वारे प्रवास करणे अशक्य असल्याने गरजवंतांना प्रवासासाठी अनावश्यक आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे. एसटी पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतुक करत असतांना, रेल्वे प्रवाशांबाबत दुजाभाव का दाखवत आहे? असा प्रश्न प्रवाशांतून विचारला जात आहे.

सद्यस्थितीमध्ये सर्वसामान्य जनता प्रवासासाठी रेल्वेलाच प्रथम प्राधान्य देते. रेल्वेचा प्रवास कमी खर्चात आणि कमी वेळेत होत असल्याने प्रवाशांची संख्या सर्वाधिक असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या जाचक अटींमुळे प्रवाशांना इतर पर्याय निवडावे लागत आहेत. एसटी तसेच खासगी प्रवासी वाहने हीच प्रवासाची साधने असल्याने प्रवास खर्च काही पटींनी वाढला आहे.

प्रवासी मिळत नसल्याचे कारण दर्शवित रेल्वेने काही मार्गांवरील प्रवासी गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यास आरक्षणाची जाचक अट कारणीभूत आहे. लहान अंताराचा प्रवास करणाऱ्यांची मात्र या निर्णयाने मोठी अडचण होत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. अनेक मार्गांवर रेल्वेच्या विशेष गाड्या धावत असताना सामान्य प्रवाशांच्या गरजांकडे रेल्वे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होत आहे. सणासुदीच्या दिवसात प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने पॅसेंजर गाड्या सुरु करण्याची आवश्यकता होती, असेही प्रवाशांच्या तोंडून ऐकायला येत आहे.

हे देखील वाचा - नांदेड जिल्हा २० हजार पार, रविवारी ८५ जण पॉझिटिव्ह, २५ रुग्ण कोरोनामुक्त
 
कोरोनाच्या अनुषंगाने लादण्यात आलेल्या निर्बंधाचा त्रास अनेक घटकांना बसत आहे. निर्माण होणाऱ्या परिस्थितीची, तसेच परिणामांची कोणालाच पर्वा नाही. नियमांचे ढोल बजावत बसण्यापेक्षा सर्व सामान्यांचे जीवन कसे सुरळीत होईल याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष पुरविण्याची नितांत आवश्यकता आहे.

नांदेड, मुदखेड, पुर्णा तसेच परभणी स्थानकांचा इतर गावांतील प्रवाशांना आधार घ्यावा लागतो. कारण ही ठिकाणे जंक्शन असल्याने आसपासच्या गावांतील प्रवाशांना या स्थानकांचा मोठा आधार आहे. त्यामुळे  त्यांच्यासाठी प्रवासी गाड्या तरी किमान सुरु कराव्यात. एसटी गाड्या व रस्त्यांची दुर्दशा पाहता जनतेची अवहेलना होत आहे. त्यासाठी किमान या मार्गावरील रेल्वे मार्ग तरी सुरु करून प्रवासी जनतेला न्याय द्यावा, अशी मागणी जनमाणसांतून जोर धरू लागली आहे. 

प्रवाशांची कुचंबना थांबवावी
पैसा आणि वेळेची बचत होत असल्याने रेल्वेच्या प्रवासाला प्रवाशांचे प्रथम प्राधान्य असते. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाचक अटींमुळे प्रवाशांची कुचंबना होत आहे. शिवाय चारपट पैसे मोजून प्रवास करावा लागत असल्याने आर्थिक त्रासतर होतोच, शिवाय मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे.
- राजाराम सखाराम पवार (प्रवासी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT