Farmers are relieved that a water shift has been planned in the catchment area of ​​Isapur Dam 
नांदेड

इसापूर धरणाच्या लाभक्षेत्रात एक पाणी पाळीचे नियोजन, शेतक-यांना मिळाला दिलासा

लक्ष्मीकात मुळे

अर्धापूर (नांदेड) : इसापूर धरणाच्या एका पाणी पाळीचे नियोजन झाले असून शुक्रवारी रब्बीच्या पिकांना पाणी देण्यात येणार आहे. या बाबतचे जाहीर प्रगटन पाटबंधारे विभागाने काढले आहे. तर रब्बी व उन्हाळी पिकांसाठीचे पाणी पाळी नियोजन अद्यापही झाले नाही. रब्बीच्या पेरणी व ऊस लागवडीवर परिणाम होत असल्यामुळे जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आॅनलाईन बैठकीत निर्णय घेवून एक पाणी पाळीचे नियोजन करण्यात आल्यामुळे शेतक-यांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे.

पाणी पाळी नियोजनबाबत दैनिक सकाळमध्ये वृत्त प्रकाशीत झाल्यावर चार दिवसात पाटबंधारे विभाग जिल्हा प्रशासनाने तातडीने बैठक घेवून निर्णय घेण्यात आल्याने शेतकरी 'सकाळ'ला धन्यवाद देत आहेत. तसेच धरणे १०० टक्के भरलेली असताना पाणी पाळी नियोजनाबाबत उशीर का होत आहे, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करित आहेत.

यंदाच्या परतीच्या पावसामुळे धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहे. खरिपाच्या हंगामात अवेळी पावसाचा फटका मूग, सोयाबीन, उडीद, कापूस आदी पिकांना बसल्याने लागवडी खर्च ही निघाला नाही. शेतक-यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. धरणे भरल्याने शेतकरी रब्बीच्या आशेवर आहेत. पण पाणी धरणात १०० टक्के पण नियोजन शून्य टक्के असल्यामुळे रब्बीच्या पेरण्या आणि ऊस लागवडीवर त्याचा परिणाम होत होता. तसेच समाज माध्यमातून प्रश्नांवर संताप व्यक्त केला जात होता. या शेतकरी हिताच्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी दैनिक सकाळ मध्ये वृत्त प्रकाशित झाले, याची दखल प्रशासनाने घेतली.

पाणी पाळी नियोजन बाबत ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात धरणातील आढावा घेऊन वेळापत्रक ठरविण्यात येते. युतीच्या काळात ही बैठक मंत्रालयात जलसंपदा मंत्र्यांच्या उपस्थित होत होती. पण गेल्या वर्षी पालकमंत्र्यांच्या बैठकीत नियोजन करण्यात आले होते. पण यंदा नोव्हेंबर अर्धा संपत आला तरी ही बैठक झाली नाही, याबाबत सकाळने प्रशासन व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधून शेतक-यांच्या मागणीला वाचा फोडली.

जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली व पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पी.एल.भालेराव, कालवा सल्लागार समितीचे सदस्य व अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत आॅनलाईन बैठक घेवून एका पाणी पाळीचे नियोजन करून शेतक-यांना दिलासा दिला आहे. तसेच येणा-या रब्बी व उन्हाळी हंगामाचे नियोजन लवकरच करण्यात येईल, असे कळविण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: तेलाच्या भीतीने शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 900 अंकांनी खाली; कोणते शेअर्स तोट्यात?

Maharashtra land law: राज्यात जुलैपासून ‘जमीन मालकी हक्क कायदा’: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा, महाराष्ट्र ठरणार पहिले राज्य!

Gold Rate Today: 1 वर्ष सोने खरेदी टाळा! मोदींच्या आवाहनानंतर सोन्याच्या बाजारात खळबळ; जाणून घ्या आजचा भाव

IPL 2026: सलग पराभवानंतर पंजाब किंग्ज अडचणीत; दिल्लीविरुद्ध ‘करो या मरो’ लढत,पहा कशी असेल Playing 11

'मुलगी आली हो...' प्रसाद ओकच्या घरी नवीन पाहुण्याचं आगमन, सोशल मीडियावर Viral Video

SCROLL FOR NEXT