Nanded News
Nanded News 
नांदेड

Video-नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी : खासदार प्रताप पाटील चिखलीकर

प्रमोद चौधरी

नांदेड :  सततच्या पावसामुळे नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळे नदी काठावरील शेतांमध्ये पाणी घुसल्याने हाता-तोंडाशी आलेली पीके जमिनदोस्त झाल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून सरसकट हेक्टर ५० हजार रुपये मदत शासनाने द्यावी, अशी मागणी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केली आहे. 

सोनखेड व शेवडी मंडळातील अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी श्री. चिखलीकर यांनी मंगळवारी (ता.२९) केली. त्यावेळी त्यांनी ही मागणी केली आहे. ते म्हणाले की, शेतकरी गेल्या चार-पाच वर्षांपासून कधी कोरड्या तर कधी ओल्या दुष्काळाशी सामना करत आहे. यंदाही चांगली पीके बहरलेली असताना सततच्या अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेली पीके नष्ट झाली आहेत. त्यामुळे शेतकरी पुरता हतबल झाला असून, त्याला आर्थिक पाठबळ देण्याची गरज असल्याचेही श्री. चिखलीकर यांनी यावेळी सांगितले. 

याप्रसंगी उपविभागीय अधिकारी श्री. बोरगावकर, तहसीलदार श्री. परळकर, गट विकास अधिकारी श्री. जोंधळे, कृषी अधिकारी सदानंद पोटतेलवार, भाजपचे नांदेड दक्षिण अध्यक्ष सुनील मोरे, बळीराम पाटील जानापुरीकर, डाॅ. पंजाबराव देशमुख, नांदेड दक्षिणचे उपाध्यक्ष खुशाल पाटील बामणीकर, पंचायत समिती उपसभापती नरेंद्र गायकवाड, माजी उपसभापती लक्ष्मण बोडके, माधव सावंत, नानासाहेब मोरे, गणेश मोरे, नागनाथ मोरे, गोविंद  महाराज, रामकिशन वड आदी उपस्थित होते. 

दिग्रस बंधारा, जायकवाडी, सिद्धेश्‍वर, येलदरी तसेच पूर्णा परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने विष्णुपुरी प्रकल्पातून सातत्याने पाण्याचा विसर्ग गोदावरी पात्रामध्ये केला जात आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावांना धोका होत असून, शेतांमध्ये पाणी घुसल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कामळज, कौडगाव, चिंचोली, येळी येथील नदीला मिलणाऱ्या नाल्याद्वारे उसावा येऊन पुराचे पाणी उभ्या सोयाबीन, ज्वारी, कापूस, तूर आदी पिके पाण्यात बुडून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

येथे क्लिक कराच - नांदेड जिल्ह्यात प्रवाशांच्या जिवाशी खेळणाऱ्या एस.टी.बसेस
 
सप्टेंबर महिन्यात झालेल्या जोरदार पावसाने व अतिवृष्टीमुळे नायगा तालुक्यातील हजारो एकर शेतातील मुग, उडीद, सोयाबीन कापूस व ज्वारीचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेने रिहावल्या खरिपाचा हंगाम धोक्यात आला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना आर्थिक मदत मिळाली पाहिजे, अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रसेलने स्टॉयनिस पाठोपाठ पूरनलाही धाडलं माघारी; लखनौचा निम्मा संघ गारद

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT