file photo 
नांदेड

शेतकऱ्यांच्या दुःखाला वाचा फोडण्यासाठी शेतकरी संघटना उतरणार रस्त्यावर

प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्ह्यातील तमाम शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची व शेतकऱ्यांची, जिल्ह्यातील सद्य परिस्थितीवर विचारविनिमय करून शेतकऱ्यांच्या दुःखाला वाचा फोडण्यासाठी व सरकारला याविषयी तडकाफडकी निर्णय घेण्याच्या संदर्भात, बैठकीचे आयोजन केले असून या बैठकीला सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या भागातील परिस्थितीची माहिती सोबत घेऊन उपस्थित राहावे, असे आवाहन नांदेड जिल्हा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे उंचेगावकर यांनी केले आहे. सदर बैठक रविवार (ता. एक) नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता, संघटनेच्या नवामोंढा येथील कार्यालयात होणार आहे.

सोयाबीनचे पीक काढणीला आले असताना नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसाने कहर केला. त्या पावसाने अनेक नदी- नाल्यांना पूर येऊन हजारो हेक्टर जमिनीतील सोयाबीन वाहून गेले. वेचणीला आलेला कापूस वाहून गेला. जीवाची पर्वा न करता शेतकऱ्यांनी जीवाचे रान करून दाम दुप्पट रोजदारी देऊन सोयाबीन काढले, परंतु आद्रतेच्या गोंडस नावाखाली अडाणी शेतकऱ्यांची व्यापारी मोठ्या प्रमाणात लूट करून शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे भाव पाडत आहेत. या गंभीर समस्येकडे बघायला कोणत्याही लोकप्रतिनिधीला वेळ मिळत नाही, ही शोकांतिका आहे. कापूस पूर्णतः भिजला असून वेचणी करून आणलेल्या कापसाचे काटे सरकारने सुरू केले नसून, शेतकऱ्यांची कापूस विक्री होत नाही. दिवाळीचा सण तोंडावर आला असून ह्या संधीचा फायदा घेऊन शेतकऱ्यांच्या सोयाबीन व कापसाची मोठ्या प्रमाणात व्यापारी लूट करत आहेत.

किमान 70 टक्केच्यावर सोयाबीन नुकसानग्रस्त 

पावसामुळे आणि आलेल्या पुरामुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून किमान 70 टक्केच्यावर सोयाबीन नुकसानग्रस्त झाले आहे. विमा कंपनीने ज्या शेतकऱ्यांचा विमा भरला गेला त्या त्या शेतकऱ्यांना सबंध जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात यावा, या संदर्भात संबंधित कंपनी आणि शासनाकडे मागणी करण्यात येईल. जिल्ह्यातील ऊस कारखानदारांनी अद्यापही शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या उसाच्या भावाची रक्कम जाहीर न करताच कारखाने गाळपाला सुरुवात करत आहेत, पश्चिम महाराष्ट्रातील सर्व कारखानदारांनी उसाचे दर जाहीर केले असून मराठवाडा आणि नांदेड जिल्हा मात्र, ऊस कारखानदार मूग गिळून गप्प बसले आहेत. 

तालुक्यातली माहिती संकलित करून सोबत घेऊन यावी

शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनो आणि शेतकरी भावांनो बळीराजा शासनाच्या सुलतानी आणि निसर्गाच्या अस्मानी संकटाच्या कचाट्यात सापडला आहे. अशा प्रसंगी शेतकरी संघटना शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही. संघर्ष केल्याशिवाय शेतकऱ्यालाही काहीच मिळणार नाही. जातीसाठी माती खाणाऱ्या शेतकऱ्यांनो आता हे सगळं सोडून, आपल्या शेतीमालाच्या भावासाठी एकत्रित होणे गरजेचे असल्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष शिवाजीराव शिंदे यांनी केले असून या बैठकीला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे व आपल्या तालुक्यातली माहिती संकलित करून सोबत घेऊन यावी. याच बैठकीत जिल्ह्यातील विविध तालुक्यातील अध्यक्ष आणि इतर तालुकानिहाय कार्यकारिणीची निवड करण्यात येणार असल्याचे त्यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे. या बैठकीस माजी प्रदेश अध्यक्ष गुणवंतराव पाटील हंगरगेकर, ॲड. धोंडीबा पवार, रामराव पाटील कोंढेकर, व्यंकटराव पा. वडजे, विठ्ठल जाधव, शिवराज पा. थडीसावळीकर, किशन पा. इळेगावकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT