नांदेड : जिल्ह्यात शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली. परंतु ते बियाणे उगवले नसल्याच्या अनेक तक्रारी कृषी विभागाकडे आल्या आहेत. यामुळे भेसळ सोयाबीन बियाणे पुरवठा करणाऱ्या कंपन्यावर गुन्हे दाखल करुन शेतकऱ्यांना दर्जेदार सोयाबीन बियाणे उपलब्ध करुन देण्याची मागणी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांच्याकडे भागवत देवसरकर यांनी केली आहे.
नामाकींत कंपनीचे बियाणे फेल
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दुकानदारांकडून चांगल्या, नामांकित कंपनीची सोयाबीन बियाणे खरेदी करून सोयाबीनची पेरणी केली होती. परंतु पेरणीला आठ दिवस उलटून गेल्यावरही सोयाबीन बियाणाची उगवण झाली नाही. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. यंदा संकटाना सामोरे जात शेतकऱ्यांनी पेरणी केली. याबाबत बियाणे उगवल्या नसल्याच्या शेतकऱ्यांनी तक्रारी कृषी विभागाकडे केल्या आहेत. यामध्ये अनेक सोयाबीनच्या कंपन्याचे बियाणे सर्टिफाइड असूनही शेतकऱ्यांनी पेरलेली बियाणे उगवले नसल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांना बियाणे न उगवल्यामुळे दुबार पेरणी करावी लागणार आहे.
हेही वाचा.....ज्येष्ठता डावलून दिला सचिवाचा पदभार.....कुठे ते वाचा
शेतकऱ्यांची फसवणूक
शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या संबंधित सोयाबीन उत्पादक कंपनीवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी. शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पेरणी करता सोयाबीनचे दर्जेदार बियाणे कृषी विभागाने त्वरित उपलब्ध करून देऊन दिलासा द्यावा अशी मागणी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांच्याकडे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य भागवत देवसरकर यांनी केली आहे.
हेही वाचलेच पाहिजे..... नांदेडला शुक्रवारी पाच रूग्णांची भर
समाधानकारक पावसानंतर पेरणी
खरीप हंगामामध्ये मृगनक्षत्रचा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी धावपळ करत सोयाबीनची पेरणी केली. परंतु पेरणी होऊनही सहा-सात दिवस झाल्यानंतर हे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सोयाबीनचे बियाणे उगवतच नसल्यानं याबाबत शेतकऱ्यांनी दुकानदाराकडे धाव घेत याबाबत विचारणा करीत आहेत. दुकानदारांची सोयाबीन बियाणे खरेदीची पावती असतानाही दुकानदार हात वर करून हा सर्व प्रकार संबंधित कंपनीवर ढकलत आहेत.
शेतकऱ्यांची कृषी विभागाकडे धाव
बऱ्याच शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारीचा मार्ग अवलंबला आहे. परंतु कृषी विभाग देखील प्रत्येक शेतकऱ्यांना शेतावर जाऊन पंचनामा करण्यास वेळ लावत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कृषी विभागाला प्राप्त तक्रारीची शहानिशा करण्यासाठी कृषी विभागाने जास्तीत जास्त पथकाची स्थापना करून नुकसान झालेल्या शेताची पाहणी करून पंचनामा करावा व नुकसानीचा अहवाल तयार करून संबधित कंपनीकडून शेतकऱ्यांना पेरणी करता सोयाबीनचे बियाणे उपलब्ध करून द्यावे. पहिल्याच पेरणीकरता बियानाची शेतकऱ्यांकडे सोय नसताना आता दुबार पेरणी करण्याची शेतकऱ्यांना वेळ आली आहे. शेतकऱ्यांची बोगस, दर्जाहीन, न उगवणारे बियाणे देऊन फसवणूक करणाऱ्या सर्वच संबंधित सोयाबीन उत्पादक कंपनीवर तात्काळ गुन्हे दाखल करून कारवाई करावी अशी मागणीही भागवत देवसरकर यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.