अर्धापूरात कचऱ्याचे ढीग 
नांदेड

अर्धापूर शहरात कचऱ्याचे ढीग; घनकचरा व्यवस्थापनाचा बोजवारा

शहरात दररोज जो कचरा जमा होतो त्या कचऱ्याच्या संकलनासाठी नगरपंचायतने पुणे येथील एका खाजगी कंपनीची नेमणूक केली आहे. प्रत्येक घरातील कचरा जमा करण्याची जबाबदारी या कंपनीवर आहे.

लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ): शहरातील सार्वजनिक स्वच्छतेसाठी वर्षाला सव्वा कोटीच्यावर खर्च होत असला तरी स्वच्छतेचा पुरता बोजवारा उडत आहे. जागोजागी कच-यांचे ढिग, तुंबलेल्या नाल्या असे चित्र पाहण्यास मिळते. स्वच्छता करणा-या कामगारास कमी मानधन तर नगसेवकांना दुप्पट मानाचे धन दरमहा मिळत असल्याची जोरदार चर्चा शहरात चविने केली जाते. पाॅकीट संस्कृतीमुळे शहराच्या विकासाचा बट्ट्याबोळ होत आसल्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.

शहरात दररोज जो कचरा जमा होतो त्या कचऱ्याच्या संकलनासाठी नगरपंचायतने पुणे येथील एका खाजगी कंपनीची नेमणूक केली आहे. प्रत्येक घरातील कचरा जमा करण्याची जबाबदारी या कंपनीवर आहे. कंपनी डोअर टू डोअर कचरा संकलित करण्यात मागील आठ महिन्यापासून अपयशी ठरली आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक मोकळ्या जागेत आजही कचऱ्याचे छोटे- मोठे ढीग दिसून येतात.

हेही वाचा - आवश्यक कागदपत्रे आणि महत्त्वाच्या सूचना जाणून घ्या

शहरातील जवळपास 25 ते 30 हजार नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही बाब अतिशय गंभीर असली तरी याकडे सवयीनुसार दुर्लक्ष करण्यात येत आहे. शहरातील 17 वॉर्डांमधील कचरा जमा करण्यासाठी चार रिक्षा आहेत. तीन ट्रॅक्टर आदी वाहने आहेत. त्यातही एखादे वाहन नादुरुस्त आहे, बंदच आहे असे उडवाउडवीची उत्तरे संबंधित कंपनीच्या सुपरवायझरकडून ऐकायला मिळतात. जमा होणाऱ्या कचऱ्यावर अजिबात प्रक्रिया होत नाही. या ठिकाणी कचऱ्याचे मोठ- मोठे ढीग तयार झाले आहेत.

शहरात जमा होणाऱ्या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावावी म्हणून राज्य शासनाचे आदेश असतानाही संबंधित कंत्राटदार हे आदेश धाब्यावर बसवत आहेत. याकडे संबंधित अधिकारी सुद्धा जाणूनबुजून डोळेझाक करत आहेत का असाही प्रश्न पडतोच. या संबंधित खाजगी कंपनीने शहरात १०० टक्के डोअर टू डोअर कलेक्शन केल्यास नागरिक सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणारच नाहीत. पण यातही ही कंपनी सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे.

येथे क्लिक करा - काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी सीआरपीएफ आणि पोलिसांच्या संयुक्त पथकावर हल्ला केला. यामध्ये दोन नागरिकही मृत्यूमुखी पडले आहेत.

त्यात भर म्हणून की काय, वॉर्डात दररोज घंटागाडी न येणे, गटारी वेळेवर साफ न करणे, गटारी साफ केल्याच तर त्यातील गाळ वेळेवर न उचलून नेणे, याबाबत संबंधित कंपनीच्या मुजोर सुपरवायझर यांना विचारणा केल्यास अरेरावीची भाषा ते बोलत असल्याचेही कळते. अश्या अनेक तक्रारी या कंपनीच्या असतांनासुद्धा संबंधित अधिकारी मुग गिळुन गप्प का? असे नागरिकांत बोलल्या जात आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी व मुख्याधिकारी यांनी या बाबीकडे लक्ष द्यावे अशी मागणी अर्धापूर शहरातील सुजाण नागरिक करत आहेत. तसेच नगरसेवकांनी आपल्या वार्डातील स्वच्छतेची काळीजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा लवकरच एक शिष्टमंडळ पालकमंत्री अशोक चव्हाण यांना भेटणार असल्याचे बोलल्या जाते.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT