Market Committee sakal
नांदेड

Nanded : बाजार बंद ठेवण्याचा अधिकार कुणी दिला?

शेतकऱ्यांचा व्यापाऱ्यांना सवाल : बाजार समिती प्रशासनाच्या सूचनेला केराची टोपली

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : हळदीच्या वायद्यांवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी येथील दि ग्रेन मर्चंड असोसिएशनने पाच दिवस मोंढा बाजार बंद ठेवून शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे. व्यापाऱ्यांनी बाजार बंद न करता आपल्या मागण्या संबधिताकडे मांडाव्यात, अशी सूचना जिल्हा उपनिबंधकांनी देऊनही व्यापाऱ्यांनी बाजार बंद केला आहे. त्यामुळे व्यापारी बाजार समिती प्रशासनालाही न जुमानता मनमानी कारभार करत असल्याचे स्पष्ट झाले. तर बाजार समिती प्रशासनही हतबल होऊन बघ्याची भूमिका घेत आहे, अशी टीका शेतकऱ्यांनी केली.

दि ग्रेन मर्चंड असोसिएशनचे अध्यक्ष माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी एनसीडीएक्स आणि बीएसईवरील हळदीचे वायदे बंद करण्याची मागणी केली. वायद्यामुळे शेतकऱ्यांचेच नुकसान होत आहे, असा अजब तर्क व्यापाऱ्यांनी मांडलाय. आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी व्यापाऱ्यांनी गुरुवार (ता. आठ) ते सोमवार (ता. १२) पर्यंत बाजार समित्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. आपल्या मागण्या मांडण्याचा अधिकार सर्वांना आहे. परंतु ऐन हंगामात शेतकर्‍यांचा बाजार पाच दिवस बंद करुन शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा अधिकार व्यापार्‍यांना कुणी दिला? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

बाजार बंदमुळे शेतकर्‍यांना बाजारात माल विकण्यासाठी अडचणी येत आहेत. याची जबाबदारी बाजार समितीनेही न घेता स्वत: जिल्हा उपनिबंधक प्रशासक असलेल्या नांदेड बाजार समितीने गुरुवारी जाहीर प्रगटन देवून शेतकर्‍यांनी पाच दिवस बाजारात शेतमाल आणू नका, असे आवाहन करुन एकप्रकारे व्यापार्‍यांचीच बाजू लावून धरल्याची टिका शेतकरी करत आहेत.

व्यापाऱ्यांच्या दबावापुढे बाजार समित्या झुकल्या. व्यापारी आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी शेतकऱ्यांच्या भल्याच्या बाता मारत शेतकऱ्यांनाच कोंडीत धरत आहेत. व्यापाऱ्यांनी बाजार समित्या बंद न करता, सरकारकडे आपल्या मागण्या करायला हव्या. त्याला कुणाचाही विरोध नसेल. मात्र, बाजार बंद ठेवण्याचा अधिकार व्यापाऱ्यांना नसायला पाहिजे. तो अधिकार शेतकऱ्यांचा आहे. त्यामुळे बेकायदेशीर बंद पुकारणाऱ्या व्यापाऱ्यांवर बाजार समित्यांनी कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

व्यापारी असोसिएशनसोबत बंदबाबत बैठक झाली. यात वायदे बाजारासंदर्भात शासनाच्या नियंत्रणात काम सुरु आहे. याबाबत सनदशीर मार्गाने मागणी करता येईल. यासाठी बाजार बंद करणे हा उपाय नाही. म्हणून बाजार बंद करु नका असे आवाहन केले होते. बाजार बंद केला तर त्यांना पत्र पाठवून सुचित करु.

- डॉ. मुकेश बाराहते, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नांदेड

वायदे बाजार शेतकर्‍यांच्या फायद्याचा आहे. यामुळे हळद उत्पादकांना इतर ठिकाणचे हळदीचे दर कळतात. यातून शेतकरी हुशार होतात. हेच व्यापार्‍यांना नको आहे. यामुळे ते बाजार बंद करुन आम्हा शेतकऱ्यांना वेठीस धरत आहेत.

- संतोष कदम, हळद उत्पादक, देगाव, ता. अर्धापूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

Latest Marathi News Updates: धुळे जिल्ह्यातील देशशिरवाडे येथे १.५ टन गोमांस जप्त

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचा मोठा दावा!

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

SCROLL FOR NEXT