photo
photo  
नांदेड

नांदेड झेडपीच्या कृषी सभापतींनी हाकली तिफण, कुठे ते वाचा..

नवनाथ येवले

नांदेड: सोयाबीनची उगवण न झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणी संकट कोसळले आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना धिर देण्यासाठी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब रावणगावकर यांनी बाधित क्षेत्राची पाहणी केली. पेरणीच्या कामात व्यस्त असलेल्या भोकर तालुक्यातील शेतकऱ्यास आधार देत चक्क तिफण हाकत पेरणी केली.

जिल्ह्यात एकूण चार लाख हेक्टर क्षेत्रापैकी निम्यावर क्षेत्रात ५६ टक्के सोयाबीन पेरणी झाली. पण बहूतांश भागात सोयबीनची उगवण झाली नाही. उगवण क्षमता कमी असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागत आहे. त्यातच मागील आठवड्यापासून पावसाने उघडीप दिल्याने पेरण्या खोळबंल्या आहेत. दुबार पेरणीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आधाराची गरज निर्माण झाली आहे.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांंच्या आदेशानुसार प्राप्त तक्रारीनुसार उगवण न झालेल्या बाधित क्षेत्राची कृषी विभागामार्फत तालुकास्तरीय समितीकडून पाहणी सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी समितीच्या बैठकीत सभापती श्री.रावणगावकर यांनी (ता.२२) जून सोयाबीनच्या सदोष बियाणे प्रकरणी दोषी कंपण्यावर कायदेशीर कारवाईचा ठराव घेतला. 

भोकर तालुक्यात सात हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला असून ६० शेतकऱ्यांनी तालुका कृषी विभागाकडे सोयाबीन न उगवल्याच्या तक्रारी दाखल केल्या आहेत. आर्थिक संकटाला तोंड देत दुबार पेरणीसाठी, मशागतीच्या कामात व्यस्त शेतकऱ्यांना बांधावर जाउन धिर देण्यासाठी सभापती श्री. बाळासाहेब रावणगांवकर यांनी बोरगाव, नागापूर, लामकणी (ता.भोकर) शिवारातील बाधित क्षेत्राची पाहणी केली. 

तालुका कृषी विभागाकडे प्राप्त तक्रारीनुसार संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सभापती श्री. रावणगावकर, भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश पाटील भोसीकर, पंचायत समिती सदस्य सूर्यकांत बिलेवाड, तालुका कृषी अधिकारी विठ्ठल गित्ते, पोखर्णी येथील कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ संदीप जायेभाये, पंचायत समिती कृषी अधिकारी छाया देशमुख, मंडळ कृषी अधिकारी रामहरी मिसाळ, कृषी पर्यवेक्षक बजरंग पुरी, कृषी सहायक पाटील आदींनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. दुबार पेरणीत व्यस्त शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव सभापती श्री. रावणगावकर चक्क तिफण हाकत पेरणी केली. 

सोयाबीनची उगवण न झालेल्या बाधित क्षेत्रांची तक्रारीनुसार पाहणी करून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांना अहवाल सादर करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने कृषी विभागाच्या समन्वयाने जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांकडून दुबार पेरणीसाठी आर्थिक संकटाला तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांशी बांधावर संवाद साधण्यात येत आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT