Nanded News 
नांदेड

Video - गाव जवळ केले, पण ग्रामस्थांनी दूर केले, तान्ह्या बाळाचे होताहेय हाल...

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : ‘‘पोटाची खळगी भरण्यासाठी आम्ही आमचे गाव सोडले. परंतु, लॉकडाउनमुळे आमचा रोजगार हिरावला गेला. परिणामी, पुन्हा आमच्या गावी बिऱ्हाडासह आलो. परंतु, आम्हाला गावात प्रवेश दिला नाही. गावाबाहेरील शाळेमध्ये आम्हाला ठेवण्यात आले. मात्र, तेथे कुठल्याच प्रकारची व्यवस्था नसल्याने आमच्याच गावात मरणयातना आम्हाला सहन कराव्या लागत आहेत’, असा संताप कामठा बु.(ता.अर्धापूर) येथे नाशिक, मुंबई, पुणे येथून आलेल्या कामगारांनी व्यक्त केला.

पोटाची खळगी भरण्यासाठी नाशिक, पुणे, मुंबई आदी ठिकाणी गेलेले गावकरी आपापल्या गावी बाडबिस्तारासह परत येत आहेत. कामठा येथेही १४ कुटुंबीय परत आले असून, या सर्वांना गावाबाहेरीत बसवेश्‍वर विद्यालयामध्ये विलगीकरणात ठेवले आहे. कुटुंबामध्ये लहान मुलेही आहेत. मात्र विलगीकरण केलेल्या ठिकाणी व्यवस्था नसल्याने अनेक समस्या भेडसावत आहे. यात लहान मुलांसह महिलांची मोठी कुचंबणा होत आहे. लाईट, फॅन नसल्यामुळे डासांशी सामना करावा लागत आहे. आरोग्य विभागाच्या वतीने फवारणी केलेली नसल्याने डेंग्यू, मलेरियासारखा आजार बळावण्याची दाट शक्यता आहे.

कामगारांचा प्रश्‍न गुंतागुंतीचा
केंद्र सरकार स्थलांतरित व अस्थलांतरित कामगारांच्या विरोधात निष्ठुरपणे धोरणे रेटत आहे. देशभरात लाखो मजूर, कामगारांचा रोजगार हिरावला गेल्याने त्यांना अन्नासाठी दाहीदिशा हिंडावे लागत आहे. त्यांच्याकडे खायला अन्न नाही की घरापर्यंत पोहचण्यासाठी पैसे नाहीत. आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालविणे त्यांच्यासाठी मोठे जिकीरीचे बनले आहे. एवढे होऊनही सरकार त्यांच्या समस्यांकडे मात्र साफ दूर्लक्ष करत आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटाचा सामना करण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना नसल्याने स्थलांतरित मजूर, कामगारांचा प्रश्‍न दिवसेंदिवस  गुंतागुंतीचा होत आहे. 

जिल्हा प्रशासनाचे सहकार्य करावे
जिल्हा प्रशासनाने आम्हाला कुठल्याही प्रकारचे सहकार्य मिळत नाही. ग्रामपंचायत पातळीवर शक्य होईल तेवढी मदत गावी परतलेल्या कुटुंबियांना करत आहे. जिल्हाधिकारी, तहसीलदारांनी कामठाच नाहीतर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायंतींना सहकार्य करायला पाहिजे. दरम्यान बुधवारी विलगीकरणातील कामगारांना पीठ, तेल देवून त्यांची तपासणी केली आहे. सात दिवसानंतर त्यांना प्रमाणपत्र देवून घरी जाऊ देणार आहे. 
- शिवलींग स्वामी, सरपंच कामठा बु.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

Pakistan Cricket : पाकिस्तानात शाहिद आफ्रिदीच्या नावावरून पसरलीय अफवा; नेमकं काय घडलं?

कोकणात मध्यरात्री बाप्पाची ‘चोरी’ होते? दारात गणपती ठेवून फटाके फोडण्यामागचं कारण ऐकून व्हाल भावूक!

SCROLL FOR NEXT