आमदार भिमराव केराम 
नांदेड

शेतकरी विरोधी कुठल्याही व्यक्तीची गय केली जाणार नाही- आमदार केराम

शेतकऱ्यांच्या हाकेला प्रतिसाद देत आमदार केराम यांनी होय. शेतकरीविरोधी कुठल्याही व्यक्तीची गय केली जाणार नसून प्रसंगी गुन्हा दाखल करण्याची कारवाई ही करण्यात येणार असल्याचे आमच्या सकाळशी बोलताना सांगितले आहे.

साजीद खान

वाई बाजार ( जिल्हा नांदेड ) : माहूर तालुका प्रशासन व पिक विमा कंपन्यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना पीक विमापासून वंचित राहावे लागले. यामुळे व्यथित झालेल्या शेतकऱ्यांनी किसान ब्रिगेड संघटनेच्या माध्यमातून आमदार भीमराव केराम यांनी निष्काळजीपणे पिक पंचनामे करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे अशी अपेक्षा प्रसिद्धी माध्यमांद्वारे व्यक्त केली होती. शेतकऱ्यांच्या हाकेला प्रतिसाद देत आमदार केराम यांनी होय. शेतकरीविरोधी कुठल्याही व्यक्तीची गय केली जाणार नसून प्रसंगी गुन्हा दाखल करण्याची कारवाई ही करण्यात येणार असल्याचे आमच्या सकाळशी बोलताना सांगितले आहे.

माहूर तालुक्यातील २०२०- २१ खरीप हंगामातील शेतकऱ्यांच्या पिक विम्याचे पैसे इफको- टोकियो कंपनीचे अधिकारी व महसूल, कृषि विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या हलगर्जी व निष्काळजीपणामुळे माहूर तालुक्यात पिकविमा मिळाला नसल्यामुळे त्यांच्यावर आमदार भीमराव केराम यांनी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी माहूर तालुका किसान ब्रिगेड तर्फे शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली होती. किनवट मतदार संघातील माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पिकविम्याचे पैसे पिकविमा कंपनीच्या अधिकारी व कर्मचारी तसेच महसूल व कृषि विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना पिकविमा मिळाला नाही.

हेही वाचा - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वैशाख बौद्ध पोर्णिमेनिमित्त व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.

लगतच्या भोकर तालुक्यात सर्वच पिकांच्या पिक विम्याचे पैसे मिळाले आहेत. केवळ विमा कंपंनीच्या कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे त्यांनी एकाच ठिकाणी बसून सदर पंचनामे केले असल्याने माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांवर जाणीव पूर्वक अन्याय केला गेला आहे. माहूर तालुक्यातील गावागावात शेतकरी आमदार साहेब पीक विम्यावर कधी बोलणार अशी अपेक्षा लावून होते. तोच आमदार भीमराव केराम यांनी शेतकऱ्यांच्या हाकेला प्रतिसाद देत माहूर तालुक्यातील नामंजूर पिक विम्याच्या प्रश्नावर जिल्हाधिकारी यांना तातडीने पत्र पाठवून संवाद साधला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे सोबत झालेल्या चर्चेनंतर आमदार केराम यांनी उक्त प्रतिनिधीला बोलताना सांगितले की, माहूर तालुक्यातील पिक विमा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असून या संबंधात जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून सकारात्मक चर्चा झाली आहे. शेतकरी प्रश्नासंदर्भात निष्काळजीपणा करणाऱ्या प्रशासनातील कुठल्याही व्यक्तीची गय केली जाणार नाही. वेळप्रसंगी शेतकरी विरोधी त्यांच्या हित संबधात बाधा निर्माण करणाऱ्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येईल असा इशारा केराम यांनी दिला आहे. एकंदरीत आमदार भीमराव केराम यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे किसान ब्रिगेड शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहेत. शिवाय शेतकऱ्यांचा पिक विमा प्रश्न लवकर निकाली निघून माहूर तालुक्यातील पिक विमा पासून वंचित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याने त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : महाराष्ट्रातल्या राजुरा मतदारसंघात व्होटचोरी करून निवडून आला भाजप आमदार? राहुल गांधींनी आकडेवारीच मांडली

Rahul Gandhi: अखेर पडला राहूल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब! मोबाईलवर OTP आले आणि काँग्रेसचे मतदार डिलीट झाले, कशी झाली वोट चोरी

Latest Maharashtra News Updates : कर्नाटकमध्ये मतचोरी पकडल्याचे राहुल गांधी यांनी पुरावे केले सादर

Pune Crime : कोथरुडमध्ये गोळीबार; गाडीला साईड न दिल्याचा वाद की काहीतरी मोठं?

Gold Ring Scheme : सरकारी दवाखान्यात जन्म घेणाऱ्या मुलींना मिळणार सोन्याची अंगठी, खासदार धनंजय महाडिक यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT