अर्धाूपरची केळी पहिल्यांदाच इराणकडे रवाना
अर्धाूपरची केळी पहिल्यांदाच इराणकडे रवाना 
नांदेड

विशेष स्टोरी : अर्धापूरची केळी आखाती देशात; यंदा पहिल्यांदा इराणला होणार निर्यात

लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : कोरोनासारख्या महामारीच्या संकटात सापडलेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. अर्धापूर तालुक्यातील पार्डी येथील शेतकरी वसंतराव देशमुख यांच्या केळीच्या मळ्यातील पहिली गाडी थेट इराणला निर्यात झाली आहे. सदरील माल अर्धापूर येथील व्यापारी यांच्या मार्फत मुंबईतील बंदरावरुन जहाजाद्वारे पाठविण्यात येणार आहे.

कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊनमुळे केळीचे दर प्रचंड खाली आले होते. अत्यल्प दरामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचा लागवडी खर्च निघणेही अवघड होऊन बसले होते. पण गत चार दिवसात मागणी वाढल्याने केळीच्या दरात बऱ्यापैकी सुधारणा झाली आहे. निर्यात केळीसाठी एक हजार रुपयापर्यंत भाव मिळत आहे. यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्याना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा - पावडेवाडी स्वतंत्र नगरपंचायतीसाठी नगरविकासमंत्री, मुख्यमंत्र्यांची घेणार भेट- बालाजी कल्याणकर

अर्धापूर परिसरासह केळीचे उत्पन्न घेतले जाते. कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे केळीच्या दरात मोठी घसरण झाली होती. लॉकडाऊनमध्ये दळणवळण व्यवस्था बंद असल्याने केळीची निर्यात थांबली होती. त्यामुळे परराज्यासह विदेशातही केळीची मागणी कमी झाली होती. केळीच्या दराने निचांक गाठला होता. मात्र लॉकडाऊनमध्ये शिथिलता होताच आणि परराज्यात केळीची मागणी वाढत असल्याने केळीच्या दरात चांगली सुधारणा झाली आहे.

चांगले पाऊसमान आणि इसापूर- येलदरी धरणात चांगला पाणीसाठा उपलब्ध असल्यामुळे केळीची लागवड झाली होती. अर्धापुर येथून उत्तर भारतातील दिल्ली, जम्मू काश्मीर, चंदीगड, हरियाणा, उत्तर प्रदेश, पंजाब व राजस्थान तर दक्षिण भारतातील तेलंगाणा, तामिळनाडू, ओडिशा व आंध्रप्रदेश या राज्यात केळी पाठविणे सुरु आहे. जिल्ह्यातील अर्धापूर परीसरात पिकणारी केळी ही खाण्यासाठी चविष्ट व टिकाऊ असल्यामुळे मोठी मागणी असते.

येथे क्लिक करा- डेल्टा प्लस व्हेरियंटची लागण झालेल्या पहिल्या रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे

पण यंदा कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊनमध्ये केळीची वाहतूक आणि मागणीत अडचण आल्यामुळे 'केळी' चे पीक संकटात सापडले होते. ३०० ते ५०० रुपयांपर्यंत दर खाली गेले होते. लॉकडाऊनमध्ये शिथिलता येताच केळीच्या भावात सुधारणा झाली आहे. राज्यामध्ये दररोज केळीचे ट्रक भरुन परराज्यात मोठ्या प्रमाणात पाठवले जात आहेत. तसेच परराज्यात केळीची मागणी वाढल्याने केळीच्या दरात थोडी सुधारणा झाली होती. त्यातच आता बाहेर देशात केळीची पहिली गाडी रवाना झाल्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांत समाधान आहे. सदरील गाडी मुंबईच्या बंदरावरुन प्रिकुलिंग करुन इराणसाठी रवाना होणार आहे. तसेच मागणी वाढत गेल्यास केळीच्या दरातही चांगली सुधारणा होईल असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amethi Congress Office: अमेठीत राडा, काँग्रेस कार्यालयाबाहेरील अनेक वाहनांची तोडफोड; भाजपवर आरोप

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 06 मे 2024

Women’s T20 World Cup: स्कॉटलँडने रचला इतिहास, वर्ल्ड कपचं पहिल्यांदाच मिळवलं तिकीट; श्रीलंकाही ठरले पात्र

Sharad Pawar : बारामतीकरांना धक्का अशक्य;निवडणुकीची अमेरिकेतही उत्सुकता

SCROLL FOR NEXT