निवडणूक esakal
नांदेड

देगलूर पोटनिवडणुकीच्या रिंगणात बारा जण, २३ अर्ज झाले होते दाखल

विधानसभेच्या देगलूर-बिलोली मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी (ता.१३) नऊ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.

सकाळ वृत्तसेवा

देगलूर (जि.नांदेड) : विधानसभेच्या देगलूर-बिलोली मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी (Deglur Bypoll) उमेदवार अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी (ता.१३) नऊ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. आता बारा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. रिंगणातील बारांपैकी सहा उमेदवार बाहेरच्या मतदारसंघातील रहिवासी आहेत. गत निवडणुकीवेळी वंचित आघाडीचे उमेदवार असलेल्या रामचंद्र भरांडे यांनी यावेळी अपक्ष म्हणून दाखल केलेला अर्ज मागे घेतला. भाजपचे (BJP) प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांचे कट्टर समर्थक असलेले माजी उपनगराध्यक्ष धोंडीबा तुळशीराम कांबळे यांनीही अपक्ष म्हणून दाखल केलेला अर्ज नाट्यमयरीत्या मागे घेतली. त्यामुळे खतगावकर गट पोटनिवडणुकीपासून (Nanded) अलिप्त राहतो की काय, अशी सुरु झालेली चर्चा तूर्त थांबली आहे. वनसेवेतील निवृत्त अधिकारी विश्वंभर जळबा वरवंटकर यांनीही निवडणुकीतून माघार घेतली.

अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्यात प्रल्हाद हटकर, धोंडीबा कांबळे, सूर्यकांत भोरगे, रामचंद्र भरांडे, आनंदा रुमाले, लक्ष्मण देवकरे, विठ्ठलराव चाबुकसार, विश्वंभऱ वरवंटकर, सिद्धार्थ हटकर या नऊ जणांचा समावेश आहे. २३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील दोन अर्ज बाद झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराऐवजी हवनाकडे वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: विरार - दादर लोकल ट्रेनमध्ये माथेफिरूचा धुमाकूळ; रेल्वे प्रवासी महिलांची सुरक्षा वाऱ्यावर

SCROLL FOR NEXT