food
food esakal
पश्चिम महाराष्ट्र

मेजवानीतून परतलेल्या एकाच कुटुंबातील अकरा जणांना विषबाधा

सकाळ वृत्तसेवा

सायंकाळी घरी परतले असता जेवून आलेल्या सर्वांच्या पोटात दुखू लागले.

खानापूर : बंकी (ता. खानापूर) येथील एकाच कुटुंबातील अकरा जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना बुधवारी (ता. २४) घडली. या सर्वांवर नंदगड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. बेकवाड ग्राम पंचाय हद्दीत येणाऱ्या बंकी गावातील अब्दुल जमादार (वय 6५) यांचे अकरा जणांचे कुटुंब मंगळवारी एम. के. हुबळी येथे पाहुण्यांकडे जेवणासाठी गेले होते. ते सायंकाळी घरी परतले असता जेवून आलेल्या सर्वांच्या पोटात दुखू लागले.

वेदना होऊ लागल्याने यातील त्यांची पत्नी नावाजबी (६०), मुले महमद, (४०) सारफराज (३५) शयनज (३२) व नातवंडे शिबरन (१२), साहिर (१४), सहना (८), जुहूर (८), आलीय (११), अजाण (४) आदींची प्रकृती अत्यवस्थ झाली. लागलीच गावकऱ्यांनी त्यांना नंदगड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टराच्याकडून उपचार सुरू करण्यात आले. यातील काहींची प्रकृती स्थिर झाली आहे. तर काहींवर अद्याप उपचार सुरू आहेत. खानापूरचे आरोग्यधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांनी तातडीने रुग्णांची भेट घेऊन पाहणी केली तसेच यासंदर्भात नंदगड पोलिसांना माहिती दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT