412 corona free in Sangli district; 361 new patients 
पश्चिम महाराष्ट्र

सांगली जिल्ह्यात 412 कोरोनामुक्त; नवे 361 रुग्ण

जयसिंग कुंभार

सांगली ः जिल्ह्यात आज नवे 361 कोरोना रुग्ण आढळले. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता 40 हजार 330 इतकी झाली आहे. त्यातील 33 हजार 784 रुग्ण बरे झाले. दिलासादायक म्हणजे गेल्या आठवडाभरापासून रोजचे नवे रुग्ण सरासरी 300 ते 400 च्या दरम्यानच आहेत. महापालिका क्षेत्रात आज कोरोनाने एकाचाही मृत्यू झाला नाही. 412 जण आज दिवसभरात कोरोनामुक्त झाले. 

आज जिल्ह्यात 10 जणांचा, तर सातारा जिल्ह्यातील एकाचा असे 11 मृत्यू झाले. दिलासादायक म्हणजे आटपाडी, कडेगाव, कवठेमहांकाळ, शिराळा अशा चार तालुक्‍यांत आज मृत्यूचा आकडा शून्य राहिला. खानापूर, जत, मिरज, वाळवा तालुक्‍यात प्रत्येकी एक, तर तासगाव, पलूस तालुक्‍यात प्रत्येकी तिघांचा मृत्यू झाला. 

गेल्या काही दिवसांत नवे रुग्ण आणि मृत्यू संख्या घटत असल्याने प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. कोविड सेंटरमधील बेडही आता रिकामे होत आहेत. गृह अलगीकरणात जिल्ह्यात तीन हजार 646 रुग्ण आहेत. जिल्ह्यात चार हजार 957 म्हणजे जवळपास पाच हजार रुग्ण उपचार घेत आहेत. 

सांगली जिल्ह्यातील स्थिती 

  • उपचाराखालील रुग्ण- 5059 
  • ग्रामीण भागातील रुग्ण- 287 
  • शहरी भागातील रुग्ण- 25 
  • महापालिका क्षेत्रातील रुग्ण- 49 
  • आजअखेरचे मृत्यू- 1487 
  • चिंताजनक रुग्ण- 705 

संपादन : युवराज यादव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Guru Purnima Remedies 2025: गुरु पौर्णिमेच्या रात्री करा 'हे' उपाय, माता लक्ष्मी प्रसन्न होतील

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Latest Maharashtra News Updates : ..तर हे स्पष्ट होईल, की महाराष्ट्राविषयीचा द्वेष हाच भाजपचा खरा चेहरा आहे! - उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT