ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या  sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव : ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या

बेळगाव तालुक्यात गेल्या महिनाभरापासून सुगी हंगामाला सुरुवात झाली आहे.

सतीश जाधव

बेळगाव : बेळगाव तालुक्यात गेल्या महिनाभरापासून सुगी हंगामाला सुरुवात झाली आहे. सद्या भात कापणी, मळणी, रताळी काढणे व ऊस तोडणी सुरु आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणासह अधून मधून पावसाच्या सरी बरसत असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. यामुळे काही ठिकाणी शेतीची कामे ठप्प तर काही ठिकाणी संथगतीने सुरु आहेत. ढगाळ वातावरण असेपर्यंत अशीच स्थिती राहणार आहे. पाऊस झाल्यास हाता-तोंडाला आलेली पिके खराब होण्याचा धोका शेतकऱ्यांना आहे.

बेळगाव तालुक्यात भातासह, बटाटे, भुईमुग व अन्य पिके घेतली जातात. मात्र मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने शेतकऱ्यांना चिंता लागून राहिली आहे. तालुक्यात भात पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यामुळे अनेकांचे भात पिक कापणीला आले आहे. मात्र, ढगाळ वातावरण असल्याने शेतकरी भात कापणीला उशीर करत आहेत. मात्र, उशीर झाल्यास पुन्हा भात खाली झडण्याचा धोकाही आहे. यामुळे भात कापले तर पावसाचे संकट तसेच न कापले तर झडण्याचे संकट शेतकऱ्यांपुढे उभे ठाकले आहे.

अनेक शेतकऱ्यांनी ऐन दिवाळीच्या दरम्यान भात कापणी केली होती. मात्र, दिवाळीतच पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. यामुळे पुन्हा जोरदार पाऊस पडेल अशी भिती शेतकऱ्यांना आहे. यामुळे अनेकांनी भात कापणी पुढे ढकलली आहे. बटाटे व भुईमुग शेंगा वेळेत काढणे गरजेचे आहे. मात्र, पावसामुळे बटाटे व भुईमुग शेंगा देखील जमिनीतच खराब होण्याचा धोका आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून ऊस तोडणी केली जात आहे. मात्र, ढगाळ वातावरण व पावसाच्या भितीमुळे अनेकांनी ऊस तोडणी करणेही थांबविले आहे. वातावरणातील बदलाकडे सर्व शेतकऱ्यांच्या नजरा आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Teacher Recruitment : 'राज्यात सरकारी-अनुदानित शाळांमध्ये तब्बल 18,500 नवीन शिक्षकांची भरती करणार'; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

Latest Maharashtra News Updates : मोटारसायकल चोराला अटक, तीन बाईक्स जप्त

उपमुख्यमंत्री शिंदेंनी कोणत्या अधिकाराखाली स्थगिती दिली? हायकोर्टाची विचारणा, बेकायदा इमारत प्रकरणी अडचणी वाढणार

Mahadevi Elephant : कोल्हापूरकरांच्या लढ्याला येणार यश? नांदणी मठाच्या 'महादेवी'साठी उच्चस्तरीय समिती घेणार निर्णय

Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार; ब्रह्मपुरी तालुक्यातील लाखापूर येथील घटना

SCROLL FOR NEXT