मलवडी - समारंभात बोलताना पृथ्वीराज चव्हाण. त्या वेळी जयकुमार गोरे, अतुल जाधव व इतर. 
पश्चिम महाराष्ट्र

आता राहणार नाही भाजपचे सरकार

सकाळवृत्तसेवा

दहिवडी - हे वर्ष निवडणुकांचे वर्ष ठरणार आहे. आता भाजपचे सरकार राहणार नाही. आमचे सरकार आल्यानंतर माण-खटावचा चेहरा-मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

दहिवडी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या मलवडी या तिसऱ्या शाखेच्या उद्‌घाटन समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार जयकुमार गोरे, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे, माजी शिक्षण सभापती ॲड. भास्करराव गुंडगे, अतुल जाधव, अर्जुन काळे, काँग्रेसचे माण तालुकाध्यक्ष एम. के. भोसले, दहिवडीचे उपनगराध्यक्ष दिलीप जाधव, सरपंच दादासाहेब जगदाळे, नितीन दोशी, डी. एस. काळे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दादासाहेब काळे, दहिवडी नगरपंचायतीचे नगरसेवक आदी मान्यवर उपस्थित होते. श्री. चव्हाण म्हणाले,‘‘साखळी बंधाऱ्याची मूळ कल्पना माण-खटावमधून आली. या कामांचा चांगला उपयोग होतो हे दिसून आले. पण, पाऊसच पडला नाही तर दुष्काळाची समस्या निर्माण होते. सध्या परिस्थिती बिकट असली तरी निराश न होता जलसंधारणाची कामे केली पाहिजेत. झाडे लावली पाहिजेत. दुष्काळामुळे भीषण पाणीटंचाई आहे. हे सरकार चारा छावण्यांना नकार देते आहे. पण, या सरकारला हे कळत नाही की माणसाला प्यायला पाणी नाही तर जनावरांना कसे मिळणार. या सरकारला दुष्काळाचे गांभीर्य नाही.’’आमदार जयकुमार गोरे म्हणाले, ‘‘उरमोडीचे पाणी पिंगळी तलावात आल्याचा आनंद आहे.

त्याचबरोबर उत्तर माणच्या दुष्काळाचे दु:ख आहे. या सरकारकडून जिहे-कटापूरची फक्त आश्वासने सुरू आहेत. पण, या योजनेला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेल्या निधी व्यतिरिक्त एकही रुपयाचा निधी या सरकारने दिलेला नाही. त्यावेळी दिलेल्या पैशावरच आज सर्व कामे सुरू आहेत. काँग्रेसचे सरकार आले की एका वर्षात जिहे-कटापूरचे काम पूर्ण करू.

जिहे-कटापूरचे पाणी उत्तर माणला लिफ्ट करून देवू. मी शब्द देतो की २०१९ मध्ये पुन्हा आमदार झालो तर जिहे-कटापूरचे पाणी आंधळी तलावात आणल्याशिवाय पुन्हा निवडणूक लढविणार नाही.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Live Updates: "सरकार संवेदनाशून्य, भाजप मराठी माणसाचा खरा शत्रू" ; आदित्य ठाकरे यांचा घणाघात

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT