मलवडी - समारंभात बोलताना पृथ्वीराज चव्हाण. त्या वेळी जयकुमार गोरे, अतुल जाधव व इतर.
मलवडी - समारंभात बोलताना पृथ्वीराज चव्हाण. त्या वेळी जयकुमार गोरे, अतुल जाधव व इतर. 
पश्चिम महाराष्ट्र

आता राहणार नाही भाजपचे सरकार

सकाळवृत्तसेवा

दहिवडी - हे वर्ष निवडणुकांचे वर्ष ठरणार आहे. आता भाजपचे सरकार राहणार नाही. आमचे सरकार आल्यानंतर माण-खटावचा चेहरा-मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

दहिवडी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या मलवडी या तिसऱ्या शाखेच्या उद्‌घाटन समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार जयकुमार गोरे, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे, माजी शिक्षण सभापती ॲड. भास्करराव गुंडगे, अतुल जाधव, अर्जुन काळे, काँग्रेसचे माण तालुकाध्यक्ष एम. के. भोसले, दहिवडीचे उपनगराध्यक्ष दिलीप जाधव, सरपंच दादासाहेब जगदाळे, नितीन दोशी, डी. एस. काळे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दादासाहेब काळे, दहिवडी नगरपंचायतीचे नगरसेवक आदी मान्यवर उपस्थित होते. श्री. चव्हाण म्हणाले,‘‘साखळी बंधाऱ्याची मूळ कल्पना माण-खटावमधून आली. या कामांचा चांगला उपयोग होतो हे दिसून आले. पण, पाऊसच पडला नाही तर दुष्काळाची समस्या निर्माण होते. सध्या परिस्थिती बिकट असली तरी निराश न होता जलसंधारणाची कामे केली पाहिजेत. झाडे लावली पाहिजेत. दुष्काळामुळे भीषण पाणीटंचाई आहे. हे सरकार चारा छावण्यांना नकार देते आहे. पण, या सरकारला हे कळत नाही की माणसाला प्यायला पाणी नाही तर जनावरांना कसे मिळणार. या सरकारला दुष्काळाचे गांभीर्य नाही.’’आमदार जयकुमार गोरे म्हणाले, ‘‘उरमोडीचे पाणी पिंगळी तलावात आल्याचा आनंद आहे.

त्याचबरोबर उत्तर माणच्या दुष्काळाचे दु:ख आहे. या सरकारकडून जिहे-कटापूरची फक्त आश्वासने सुरू आहेत. पण, या योजनेला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेल्या निधी व्यतिरिक्त एकही रुपयाचा निधी या सरकारने दिलेला नाही. त्यावेळी दिलेल्या पैशावरच आज सर्व कामे सुरू आहेत. काँग्रेसचे सरकार आले की एका वर्षात जिहे-कटापूरचे काम पूर्ण करू.

जिहे-कटापूरचे पाणी उत्तर माणला लिफ्ट करून देवू. मी शब्द देतो की २०१९ मध्ये पुन्हा आमदार झालो तर जिहे-कटापूरचे पाणी आंधळी तलावात आणल्याशिवाय पुन्हा निवडणूक लढविणार नाही.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT