पश्चिम महाराष्ट्र

इतिहासात भाजपचे प्रथमच स्वतंत्र पॅनेल

सकाळ डिजिटल टीम

निवडणुकांसाठी या निवडणुकीचा पक्ष म्हणून विस्तारासाठी नक्की फायदा होणार आहे.

सांगली : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत खासदार संजयकाका पाटील यांच्या धक्कादायक माघारीनंतर भाजपने १६ जागांवर पॅनेल उभे केले आहे. हे पॅनेल किती मजबूत याबद्दल प्रश्‍न उपस्थित होतील. मात्र एक निश्‍चित की एखाद्या पक्षाने स्वतंत्रपणे जिल्हा बँकेत उतरण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. ही निवडणूक पक्षाच्या चिन्हावर नसली भाजपने पक्ष म्हणून या निवडणुकीत आव्हान दिले आहे. जिल्ह्याच्या राजकारणातील पूर्वेइतिहासा प्रमाणे इथेही या पॅनेलला बीजेपी की जेजेपी म्हणायचे अशा शंका उपस्थित केल्या जात असातानाही ही वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे. भाजपसाठी आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकांसाठी या निवडणुकीचा पक्ष म्हणून विस्तारासाठी नक्की फायदा होणार आहे.

भाजपला या निवडणुकीपूर्वी अनेक धक्के बसले आहेत. त्यामुळे भाजप जोरदार टक्कर देणार की लुटुपुटुची लढाई लढणार याची उत्सुकता आहे. अर्थात काही ठिकाणी मात्र भाजपा उमेदवारांना जोरदार टक्कर द्यावी लागणार आहे. जयंतरावांनी बिनविरोध चर्चेचे गुऱ्हाळ सुरू केल्यानंतर भाजपला काही जागा देत गुंडाळणार अशीच चर्चा होती. राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष पेटल्यामुळे निवडणुकीत सर्वजण एकत्रित येण्याची शक्यता मावळली. तरीही राष्ट्रवादीचे नेते पालकमंत्री जयंत पाटील यांनी शेवटच्या टप्प्यात भाजपला दोन जागांचा प्रस्ताव दिला. तो मान्य झाला नाही. तशातच कवठेमहांकाळ सोसायटी गटाची जागा शिवसेनेला दिली. खासदार पाटील यांना तेथून उमेदवारी हवी होती. तेथे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मतांची गोळाबेरीज जास्त होती. त्यामुळे संजयकाकांनी निर्णायक क्षणी माघार घेतली. हा निर्णय सर्वांनाच धक्कादायक होता.

बँकेच्या निवडणुकीत भाजपचे नेतृत्व खासदार आणि बँकेचे उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्याकडेच होते. परंतु त्यांच्या माघारीमुळे एकाकीपणे लढण्याची वेळ भाजपवर आली आहे. जिल्हा बँकेची मागील निवडणूक सर्वपक्षीय नेतेमंडळींच्या दोन पॅनेलमध्ये झाली. त्यानंतर भाजपने सत्ताधाऱ्यांसोबत राहुन कारभार सांभाळला. परंतु आता बँकेची निवडणूक पहिल्यांदाच स्वतंत्रपणे लढण्याची वेळ भाजपवर आली आहे. महाआघाडीतील राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि शिवसेना यांचे प्रत्येकी एक उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. एकप्रकारे त्यांनी विजयी सलामीच दिली आहे. आता २१ पैकी उर्वरित १८ जागांसाठी निवडणूक लागली आहे.

भाजपने १६ जागांवर शेतकरी विकास पॅनेलच्या माध्यमातून उमेदवार उभे केलेत. आणखी दोन उमेदवार घेऊन १८ जागांवर लढत द्यावी लागणार आहे. मात्र भाजपच्या पॅनेलमध्ये ऐनवेळी राष्ट्रवादीचे प्रकाश जमदाडे यांना मिळालेले स्थान राष्ट्रवादीबाबत संशयाचे वातावरण निर्माण करणारे ठरले आहे. जतमधील ही लढत जिंकली तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील आघाडीला सुरुंग लागू शकतो याची पक्की जाणीव भाजपच्या नेत्यांना आहे. त्यामुळे भाजपच्या पुढच्या जिल्हा व्यापी राजकारणासाठी जतची जागा निर्णायक ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT