Black Day In Karnataka Marathi News 
पश्चिम महाराष्ट्र

का होत नाही काळ्या दिनात सहभागी झालेल्यावर गुन्हा दाखल...?

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : काळ्या दिनात सहभागी होत असतील तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करता येणार नाही. अशी चफराक मराठी भाषिकांवर कारवाई करणाऱ्या कन्नड संघटनाच्या पदाधिकाऱ्यांना राज्य सीमा व जल आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायामूर्ती मंजुनाथ लगावली. सीमाप्रश्‍ना बाबत कोणताही नेता काही बोलला म्हणून न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी अवमान याचिका न्यायालयात दाखल करणे चुकीचे ठरते. सध्या प्रश्‍न कोर्टात आहे. त्यामुळे आपल्याला अडचण येऊ शकते. मात्र, याबाबत न्यायालयाकडे अंतरिम अर्ज दाखल करू शकतो. त्यासाठी सरकारकडे शिफारस करू, असे आश्‍वासन निवृत्त न्यायामूर्ती मंजुनाथ यांनी सोमावारी (ता.3) विविध कन्नड संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.

राज्य सीमा व जल आयोग, प्रशासन आणि विविध कन्नड संघटनाच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत सीमाप्रश्‍न व इतर विषयवार चर्चा झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती मंजुनाथ होते. व्यासपीठावर जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मन्नहळ्ळी, ऍड. एम. बी. जिर्ली, पोलिस आयुक्त बी. एस. लोकेशकुमार, जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निबरगी आदी अधिकारी उपस्थित होते. 

मराठी भाषिकांची संख्या कमी
प्रारंभी श्री. मंजुनाथ म्हणाले, सीमाप्रश्‍नाबाबत न्यायालयात आपली बाजू भक्कम आहे. त्याप्रकारचे पुरावे आहे. ज्या तत्वावर बेळगावर आपला हक्क असल्याचा दावा न्यायालयात महाराष्ट्राने दाखल केला आहे. त्यानुसार दावा टिकणार नाही. 1956 नुसार सीमाभागातील भाषिकांची आकडेवारी पाहिल्या मराठी भाषिकांची संख्या कमी झाली आहे. तर कन्नड भाषिकांचा टक्का वाढलेला आहे. भाषिक अल्पसंख्याक कायदानुसार महाराष्ट्र 70 टक्‍क्‍याहून अधिक मराठी भाषिक सीमाभागात असल्याचा दावा करत आहे. मात्र, प्रत्यक्ष गणती पाहिल्यास सर्व फोल ठरणार आहे. त्यामुळे न्यायालयात आपली बाजू भक्कम आहे. त्यामुळे कोणतीच काळजी करू नका. 

बेळगावात सुवर्णसौध

यावेळी कन्नड संघटनाचे पदाधिकारी म्हणाले, महाराष्ट्र शासनाने सीमाप्रश्‍नासाठी दोन समन्वयक मंत्र्यांची नेमणुक केली आहे. पण, आपल्या सरकारकडून प्रश्‍नाकडे दुर्लक्ष केले आहे. त्याचबरोबर आयोक बंगळूरातून काम चालवत आहे. बेळगावात सुवर्णसौध उभारण्यात आली असून याठिकाणी आयोगाचे कार्यालय सुरू करावे.महाराष्ट्रातील नेते बेळगावमध्ये येऊन सीमाप्रश्‍नावर भाष्य करत आहे. आपल्या राज्यात येऊन अरेरावीची भाषा करत आहेत. येथील मराठी संघटनाकडून कर्नाटकाच्या विरोधात कारवाई करत आहेत. यांच्यावर कायदेशीर गुन्हा का दाखल केला जात नाही. बेळगावात आलेल्या मराहाराष्ट्रातील नेत्यांवर अवमान याचिका का दाखल केली जात नाही. काळा दिन पाळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा. अशी मागणी केली. 

राज्योत्सवाच्या आड आल्यास गुन्हा दाखल

यावेळी श्री. मंजूनाथ म्हणाले, काळा दिन त्यांनी आपल्या परीने पाळत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करता येणार नाही. मात्र, त्यांनी राज्योत्सवाच्या आड आल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करता येतात. महाराष्ट्रातील नेते याठिकाणी आल्यामुळे अवमान याचिका दाखल केली तर आपल्याला अधिक अडचण आहे. खटला चाविण्यास पुन्हा उशिर होणार. त्यामुळे त्यांनी काही करूदेत आपली बाजू भक्कम असून न्यायालयीन लढा लढण्यावर अधिक लक्ष केंद्रीत करूया. असे कन्नड भाषिक संघटानाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ‘’नितीश कुमार यांना भारतरत्न द्या’’, जेडीयू नेते केसी त्यागींची पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडे मागणी!

WPL 2026 : Nadine de Klerk ची अष्टपैलू कामगिरी, RCB ने थरारक सामन्यात मारली बाजी; गतविजेत्या MI ची हार

महत्त्वाची बातमी! महापालिका निवडणुकीचा प्रचार मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता थांबणार; उमेदवारांचे पदयात्रा, घरोघरी भेटींवर भर, सोशल मिडियाचा वापर, वाचा...

Rahul Gandhi Attacks on BJP : दूषित पाणी, विषारी कफ सिरप ते अंकिता भंडारी हत्या ; राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात!

HSC Hall Ticket 2026 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेचे प्रवेशपत्र 'या' दिवसापासून मिळणार!

SCROLL FOR NEXT