पश्चिम महाराष्ट्र

Belgaum Election Result 2021 Update: काॅग्रेसच्या जारकीहोळींची आगेकूच: अंगडी यांच्या मताधिक्यात घट; शेळकेंचे अर्धशतक

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव: भाजप उमेदवार मंगला अंगडी यांचे मताधिक्य घटले आहे. सुरवातीपासून सुमारे दहा ते चौदा हजार मताधिक्यांनी त्या आघाडीवर होत्या. पण, आता मताधिक्यात घट होऊन त्या सुमारे सहा हजार मतांनी आघाडीवर आहेत. लक्षवेधी बाब म्हणजे महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार यांना ४७ हजार मते पडले असून, ५० हजाराच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरु आहे. सुरवातीला अगदी नगण्य मानण्यात येणारे महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवारांनी शुभम शेळके यांच्या लक्षवेधी कामगिरीमुळे मराठी भाषिक आणि सीमाभागातील जनतेच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

बेळगाव लोकसभा पोटनिवणुकीसाठी चुरशीने झालेल्या मतदानामध्ये मंगला अंगडी यांनी आघाडी घेतली होती. १० ते १२ हजार मताधिक्यांनी त्या आघाडीवर होत्या. परंतु, ५० टक्के मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आघाडीचा टक्का घटला आहे. सहा हजार मतांनी आघाडी घेतली आहे. यामुळे सुरवातीला भाजप गोटात चैतन्याचे वातावरण होते. पण, आता थोडीशी चिंता सुरु आहे.

दुपारी सव्वा बारा वाजेपर्यंत भाजप उमेदवार मंगला आघाडी यांना १ लाख ८३ हजार २५७ मते पडली आहेत. सतीश जारकीहोळी यांना १ लाख ७७ हजार १२२ मते पडली आहेत. महाराष्ट्र एकीरण समितीचे उमेदवार ४८ हजार ८१२ मते पडली आहेत. शेळके यांना पडलेली लक्षणीय मते मराठी भाषिकांच्या आशा पल्लवीत करणाऱ्या ठरल्या आहेत.

Edited By- Archana Banage

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT