पश्चिम महाराष्ट्र

Coronavirus : 'त्यांचे' रिपाेर्ट निगेटिव्ह आल्याने सातारकरांसह कऱ्हाडकरांना दिलासा

सकाळ वृत्तसेवा

सातारा : सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर या ठिकाणी कोरोना बाधीत रुग्णाच्या संपर्कात आलेल्या दाेन निकट सहवासितांना येथील जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल केले होते. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने एन.आय.आय.व्ही. पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्यांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. दरम्यान शुक्रवारी कराडमध्ये प्रशासनाने खबरादारीसाठी कडक उपाययाेजना आखल्या. हे दाेन्ही रिपाेर्ट निगेटिव्ह आल्याने जिल्ह्यावासियांना दिलासा मिळाला आहे.

याबराेबरच कराड येथील कृष्णा मेडिकल कॉलेज येथे विलगीकरण कक्षात सातारा जिल्ह्यातील तीन वर्षीय मुलाला ताप, खोकला, श्वसनास त्रास होत असल्याने व 15 वर्षीय मुलीला ताप, खोकला असल्याने दाखल केलेल्या दाेन रुग्णांच्या घशातील स्त्रावाचे नमुने एन.आय.आय.व्ही. पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्यांचे रिपोर्टही निगेटीव्ह आले आहेत अशी माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे.

सातारा जिल्ह्यात सध्यस्थिती दाेनच रुग्ण काेराेनाची लागण झालेले आहेत. त्याव्यतरिक्त सर्वांचे रिपाेर्ट निगेटीव्ह आलेले आहेत. नागरीकांनी घरी राहूनच प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी शेख सिंह यांनी केले आहे.

सांगलीत कुटुंबातील आणखी १२ जणांना कोरोना 

सांगली ः
इस्लामपूर येथील कोरोनाग्रस्त कुटुंबातील आणखी १२ जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले. त्यात सहा पुरुष आणि सहा महिलांचा समावेश आहे. त्यांचे अहवाल दुपारी हाती आले. आता सांंगली जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या एकूण २३ झाली आहे. त्यात संबंधित कुटुंबात काम करणाऱ्या दोन मोलकरणींचा समावेश आहे. त्यांच्यावर मिरज येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, यासोबत पाठवलेले १३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे आणि डॉ. भूपाल गिरीगोसावी यांनी ही माहिती दिली.
 
जिल्ह्यात चार दिवसांपूर्वी चार रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. इस्लामपूर येथून सौदी अरेबियात हज यात्रेसाठी जाऊन आलेल्यांना ही लागण झाली. त्यामुळे या चार जणांशी संबंधित लोकांना तातडीने विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्यांतील कोरोनाची लक्षणे दिसणाऱ्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. दुसऱ्या टप्प्यात त्याच कुटुंबाशी निगडीत ५ जणांना लागण झाल्याचा अहवाल आला आणि काल त्यात आणखी दोन जणांची भर पडली होती. त्यात दोघीही महिला असून एका मोलकरणीचा समावेश होता. आज दुपारी त्यात आणखी १२ जण कोरोनाग्रस्त असल्याचे स्पष्ट झाले असून, आता जिल्ह्यातील एकूण संख्या २३ झाली आहे. 

कोरोनाच्या भीतीने गावाकडे परतताना काळाचा घाला ; आई वडिलांसह चिमुकल्याचा मृत्यू 

यामुळे आता इस्लामपूर "हाय अलर्ट' करण्यात आले आहे. या कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या एकूण ३९ जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यांचे अहवालही अद्याप यायचे आहेत. त्यातील कोरोनाची लक्षणे दिसून आलेल्यांचे नमुने पाठवून तपासणी केली जात आहे.
 
मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात या रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. आधीपासूनचे सर्वच रुग्ण येथे ठेवण्यात आले आहेत. आता विलगीकरण कक्षातून हे नवे बारा रुग्णही मिरजेत दाखल केले जाणार आहेत. या रुग्णांसोबत आणखी १३ जणांचे नमुने पाठवण्यात आले होते. ते निगेटिव्ह आल्याने त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी निःश्वास टाकला आहे. या लोकांना काही काळासाठी विलगीकरण कक्षात ठेवून घरी सोडले जाणार आहे. 

सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर 

विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेल्या २३ कोरोनाग्रस्त रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अफवांवर विश्‍वास विश्‍वास ठेवू नका, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी केले आहे.

Coronavirus : ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर ट्रस्ट सरसावले; 50 लाखांचा निधी जमा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Mumbai News: नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, वेसावे ते भाईंदर कोस्टल रोडच्या कामाला वेग

Latest Maharashtra News Live Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT