Dams filled the Ped area; The water problem is solved 
पश्चिम महाराष्ट्र

पेड परिसरात बंधारे भरले; पाण्याचा प्रश्‍न मिटला

गजानन पाटील

पेड : गेल्या दोन वर्षात झालेल्या दमदार पावसामुळे परिसरातील भूजल पातळीत वाढ झाली आहे. तलाव ओसंडून वाहू लागले आहेत. ओढे, नाले, बंधारे पूर्ण क्षमतेने भरले आहेत. परिसरात बागायत क्षेत्रात वाढ झाली आहे. पिण्याच्या तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न मिटला आहे. यावर्षी ऊस, गहू यासह अन्य पिके जोमाने डोलत आहेत. 

जलयुक्त शिवार, पाणी आडवा, पाणी जिरवा कार्यक्रम यातून कापूर ओढ्यावर बंधारे बांधले गेले. ते तुडुंब भरले. दोन वर्षांपासून गाव टॅंकरमुक्त झाले. प्रत्येक वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात पिण्याच्या पाण्याची समस्या येते. ती यंदा आली नाही. पेड तलावापासून ते हजारवाडीपर्यंत जवळपास 16 ते 17 लहान मोठे बंधारे बांधले आहेत. पावसाचे पाणी जमिनीत मुरले आहे. 

सलग दोन वर्षे दमदार पावसाने पेडचा तलाव भरून ओसंडून वाहता झाला. सर्व बंधारे तुडुंब भरले. मुबलक प्रमाणात पाणी आले. विहिरी आणि कुपनलिकांच्या पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली. गहू, हरभरा, ऊस तसेच अन्य पिकांच्या बागायत क्षेत्रात वाढ झाली आहे. गेल्या वर्षीपासून शेतकऱ्यांनी नवीन द्राक्षबागांच्या लागण केली आहे. ओढा पात्रात अजूनही वाहते पाणी आहे.


संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Police Service: खाकीतील माणुसकीचा अनोखा चेहरा! 112 वर कॉल करा, पोलिस पोहोचवतील औषधे आणि जीवनावश्यक वस्तू

Video : निष्ठा असावी तर अशी! मालकाचा जीव वाचवण्यासाठी कुत्र्याने शेवटच्या श्वासापर्यंत कोब्राशी दिली झुंज; व्हिडिओ पाहून नेटकरीही हळहळले

RBI on Inflation: दिवाळीत महागाईचा फटका बसणार? RBI गव्हर्नरांचा मोठा इशारा; कारण काय?

Latest Marathi News Live Update : विरोधकांनी रांचीमध्ये JPSC पेपरफुटीच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांशी चर्चा केली का? भाजप खासदार जगदंबिका पाल यांचा सवाल

NCP Politics: मोठी राजकीय घडामोड! रुपाली चाकणकरांनंतर अखेर नवे नेतृत्व; वैशाली नागवडे यांच्याकडे NCP महिला प्रदेशाध्यक्षपदाची धुरा

SCROLL FOR NEXT