District Bank should stop making farmers loan issues: Sunil Farate; Demand for change of order 
पश्चिम महाराष्ट्र

जिल्हा बॅंकेने शेतकऱ्यांना कर्जाचा गोंधळ थांबवावा :  सुनिल फराटे; आदेशात बदल करण्याची मागणी 

बलराज पवार

सांगली : शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्याबाबत जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने सोसायटांच्या कर्ज वसुलीच्या टक्केवारीची विचित्र अट घातली आहे. ही अट पाहून नव्याने कर्ज घेऊन इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांची अडचण होणार आहे. त्यामुळे त्यांनी आदेशात बदल करावी, अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनिल फराटे यांनी केली आहे. त्याबाबतचे निवेदन बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांना दिले आहे. 

श्री. फराटे म्हणाले, ""शेतकरी चहुबाजूंनी अडचणीत आला आहे. गेल्यावर्षी महापुराचे संकट होते. पिके वाया गेली. हाती उत्पन्न आले नाही. कर्ज भागवता आली नाहीत. पुन्हा शेती सावरण्यासाठी तो संघर्ष करतोय. त्यात आता अतिवृष्टीने कंबरडे मोडले आहे. शेतकरी कसा उभा राहणार? त्यातच जिल्हा बॅंकेने वसुलीच्या मुद्यावर कर्ज पुरवठ्याचे कडक धोरण राबवण्याचे ठरवले आहे.

त्यानुसार दुष्काळी भागात 40 टक्के आणि बागायती भागात 60 ते 70 टक्के वसुली असेल तरच शेतकऱ्यांना मध्यम व दीर्घ मुदतीचा कर्जपुरवठा करा, असे आदेश दिले आहेत. या ठिकाणी नव्या कर्जदाराला कर्ज हवे असेल तर काय करायचे? त्या सोसायटीने कर्ज वाटपच थांबवले तर जो थकित नाही, त्या शेतकऱ्यांचे काय? याचा खुलासा आदेशात नाही.'' 

ते म्हणाले, ""जिल्हा बॅंकेने ऑक्‍टोबर ते मार्च पीक कर्जावरील व्याज सोसायट्यांकडून चार टक्‍क्‍यांनी घेतले आहे. शासन आदेश असताना ही वसुली केली आहे. ते पैसे सोसायट्यांना परत करावेत. जिल्हा बॅंकेतील अंतर्गत राजकारणाचा शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करताना परिणाम होऊ नये, याची काळजी घ्यायला हवी.'' 

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: १५ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय T20त शतक! नाबाद १११ धावांनी रचला इतिहास; अनेक विक्रम मोडले, फलंदाजने मैदान गाजवले

Ashok Kharat Case : कालाय तस्मै नम:! चाकणकरांनी पीडितांना न्याय न दिल्यानं परतफेडीची वेळ, खरातला राजकीय पाठबळ; रोहिणी खडसेंचा घणाघात

April Travel Destination: एप्रिलमध्ये ट्रिप प्लॅन करताय? या’ 5 ठिकाणांना भेट देणं ठरेल बेस्ट

बॅट दे रे...! T20 World Cup मध्ये तीन भोपळ्यांनंतर अभिषेक शर्माचा मेसेज येताच काय दिलं शुभमन गिलने उत्तर; पाहा Video

मला अटक केली तर तुमच्यावर कोप होईल; अटकेआधी अशोक खरातची पोलिसांना धमकी; नेमकं काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT