Farmer  
पश्चिम महाराष्ट्र

मुख्यमंत्री महाेदय कर्जमाफीचे तेवढे बघाच

विशाल पाटील

सातारा : "दुष्काळ कोरडा असो की ओला, संकटात तुमच्यासोबत आहे. तुमची संपूर्ण कर्जमाफी करणार आहे,' असे आश्‍वासन नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना दिले होते. सध्या राज्यभरात अतिवृष्टी, महापुरांमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून, पीक कर्जही भरणे मुश्‍कील झाले. राज्यपालांनी जाहीर केलेली नुकसान भरपाईची मदत अत्यंत तोकडी असल्याने संपूर्ण कर्जमाफीचे आश्‍वासन देणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळचे मोबाईल ऍप डाऊनलोड करा.
 
गत पावसाळ्यात अतिवृष्टी, सातत्याने पडलेल्या पावसामुळे बहुतांश ठिकाणी महापूर, पूर आले. त्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले. त्यात पुन्हा एकदा परतीच्या पावसाने जिल्ह्यास मेटाकुटीला आणले. अतिपावसामुळे पिके कुजून गेली. बहुतांश शेतकऱ्यांच्या पिकांचे उत्पादन घटले. फळ, बागांचे प्रचंड नुकसान झाले. त्यात निवडणुकीचा निकाल लागूनही महिनाभर सरकार स्थापन झाले नाहीत. त्यातच राष्ट्रपती राजवट लागू झाली. राज्यपालांनी जिरायती शेतीसाठी हेक्‍टरी आठ हजार, तर बागायती व फळबागांसाठी हेक्‍टरी 18 हजारांची मदत जाहीर केली. मात्र, नुकसानची तुलनेत ही मदत अत्यंत तोकडी आहे.
 
उद्धव ठाकरेंचा दाैरा अन्...

उद्धव ठाकरेंनी सातारा, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भेटी घेतली. त्या वेळी त्यांनी "तुमची संपूर्ण कर्जमाफी करणार आहे. आपले सरकार स्थापन होताच कर्जमाफी केली जाईल. खचून जायचे नाही, आत्महत्या करायची नाही, धीर सोडायचा नाही, शेतकरी मर्द असतो, तो प्रत्येक संकटाचा सामना करतो, त्याला धीर देण्यासाठी आम्ही आहोत,' असे आश्‍वासन दिले होते. आज ते सायंकाळी शपथविधी घेत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आता महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आता संपूर्ण कर्जमाफीकडे लागल्या आहेत. 

हेही वाचा - साताऱयात अतिक्रमणांचे साम्राज्य ; राजेंच्या सूचनांकडे दुर्लक्ष

हे होते आश्‍वासन... 

सत्ता स्थापनेचा पेच सुरू असतानाच उद्धव ठाकरेंनी सातारा, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भेटी घेतली. त्या वेळी त्यांनी "दुष्काळ कोरडा असो की ओला, संकटात तुमच्यासोबत आहे. तुमची संपूर्ण कर्जमाफी करणार आहे. कर्ज प्रकरणात बॅंक तगादा लावत असेल तर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करा. आपले सरकार स्थापन होताच कर्जमाफी केली जाईल,' असे आश्‍वासन दिले होते. 

एकूण शेतकरी संख्या  
बाधित शेतकरी   1,42,114
पीक कर्ज न घेतलेले 1,27,542
पीक कर्ज घेतलेले 14,572
पीक कर्ज 32.73 (रक्‍कम लाखात)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकलचा खोळंबा, प्रवाशांचा संताप! मुंबईकडे जाणारी ट्रेन ४० मिनिटं लेट, बदलापूर स्टेशनवर उसळली गर्दी

अहिल्यानगर हादरलं! 'अपहरणानंतर तरुणीवर सामूहिक अत्याचार'; युवतीला मदतीचा बहाणा करून दुचाकीवर बसवलं, ती रडत हाेती अन्..

Kolhapur Politics : पंचायत समिती आरक्षण सोडतीवेळी प्रशासनाची चूक, माजी जिल्हा परिषद सदस्याचा बीपी झाला लो अन्...

Pune Accident: बड्डेच्या शुभेच्छा ऐवजी अंत्यसंस्काराची वेळ! 'दुचाकी खोल खड्ड्यात कोसळून दोन तरुणांचा मृत्यू'; आंबेगाव तालुक्यातील घटना

Latest Marathi News Live Update : RSS कार्यकर्ते भारताचे काही विशेष नागरिक आहेत का?

SCROLL FOR NEXT