hd devegowda comment on ad yeddyurappa government 
पश्चिम महाराष्ट्र

येडियुराप्पा सरकार कार्यकाळ पूर्ण करेल 

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव - मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार आपला कालावधी पूर्ण करेल. मध्यावधी निवडणुका व्हाव्यात, अशी आमची अपेक्षा नसून प्रादेशिक पक्षांमुळेच राज्य, देशांचा विकास शक्‍य होतो, असा विश्वास माजी पंतप्रधान एच. डी. देवगौडा यांनी बुधवारी (ता. 19) पत्रकार परिषदेत व्यक्‍त केला. 

श्री. देवेगौडा पुढे म्हणाले, ""गेल्या काही वर्षात धजदने अनेक चढउतार पाहिले आहेत. पण, आता पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याची गरज आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांची बोट बांधली जात असून तळागळातील कार्यकर्त्यांना संधी देवून संघटनात्मक बांधणी केली जाणार आहे. पक्षातील निष्ठावंतांवरही जबाबदाऱ्या दिल्या जाणार असून राज्यात तसेच देशात धजदला मजबूत पक्ष बनविणार आहे. देशातील राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांची कामगिरी पाहिली आहे. त्यात राष्ट्रीय पक्षांच्या तुलनेत प्रादेशिक पक्षांनी आपापल्या राज्यात विकास साध्य केला आहे. केरळ, तमिळनाडू, आंध्रप्रदेश व दिल्ली आदी राज्ये त्याची उदाहरणे असून संबंधित राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांची संघटना भक्‍कम झाली पाहिजेत.'' 

विधान परिषद निवडणुकीत धजदचे आमदार जी. टी. देवगौडा यांनी भाजपला मतदान केल्याची माहिती मिळाली आहे; पण या निवडणुकीसाठी धजदने व्हीप जारी केला नव्हता. जी. टी. देवगौडा हे कॉंग्रेस किंवा भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा आहे. परंतु, त्याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. विधान परिषद निवडणुकीत व्हीप जारी करुन आमदारांना बांधून ठेवणे योग्य नाही. त्यासाठी आम्ही व्हीप जारी केला नव्हता, असेही माजी पंतप्रधान देवेगौडा म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'विझलो जरी मी...', पोस्ट ठरली अखेरची, नगराध्यक्षपदाची निवडणूक लढलेल्या मनसे नेत्याचा अपघाती मृत्यू

Satara Fraud: 'साताऱ्यातील महिलेला २५ तोळे दागिन्यांना गंडा'; मैत्री नडली अन् चाैकशीत आलं धक्कादायक कारण समाेर..

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ‘या’ विद्यार्थ्यांना दरवर्षी मिळणार 12,000 शिष्यवृत्ती; वार्षिक उत्पन्न 3.50 लाख रुपये अन्‌ आठवीत पाहिजे ५५ टक्के गुण

मोठी बातमी! दारूचे दर वाढले अन्‌ विदेशी दारूचा खप झाला कमी; बनावट दारू व हातभट्टीची वाढली विक्री; दुकानदारांकडूनही हिशेबात चलाखी, वाचा...

Christmas Special: केळीपासून फक्त बनाना केकच नाही! ‘हे’ 5 ख्रिसमस रेसिपी ट्राय करा, सगळे विचारतील सीक्रेट

SCROLL FOR NEXT