sakal
पश्चिम महाराष्ट्र

इचलकरंजी: हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला

सततच्या पावसाने सोयाबीनच्या झाडावरच कोंब फुटत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे

ऋषीकेश राऊत

इचलकरंजी: सततच्या पावसाने काढणीच्या अवस्थेतील सोयाबीनला फटका बसत आहे. शेंगांना झाडावरच कोंब फुटण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. आधीच शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हाती आलेला सोयाबीनचा घास पावसाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. काही दिवस पाऊस असाच पडला तर सोयाबिन उत्पादन मोठ्या प्रमाणात घटण्याची धास्ती उत्पादकांना आहे.

संकटांची मालिका शेतकऱ्यांची पाठ सोडताना दिसत नाही. महापुरात उद्ध्वस्त झालेले शेतकरी सध्या सावरत आहेत. उरल्यासुरल्या शाबूत पिकातून उत्पादनाची आशा शेतकऱ्यांना आहे. हातकणंगले तालुक्यातील प्रमुख नगदी पीक असणारे सोयाबीन आता पडणाऱ्या पावसाने धोक्यात आले आहे. सोयाबीन काढणीला आले असताना पावसाच्या संकटाने उत्पादक भीतीच्या छायेत आहेत. त्यामुळे पाऊस थांबला नाही तर सोयाबीन शेतकऱ्यांच्या हातातून जाण्याची शक्यता दाट आहे.

पाऊस मळणीसाठी घातक

सोयाबीन परिपक्व झाल्याने काढणीसाठी शेतकऱ्यांची धांदल सुरू आहे.पण यामध्ये पावसाचा व्यत्यय येत आहे.अशा परिस्थितीत मळणी सोयाबीनला घातक ठरणारी आहे.पावसामुळे मळणीनंतर पुढच्या प्रक्रिया शेतकऱ्यांच्या हाताबाहेर आहेत. त्यामुळे पाऊस थांबण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.

कीड, तांबेरा रोगांचा प्रादुर्भाव

ऑगष्ट महिन्यात काही ठिकाणी सोयाबीन पिकावर कीड व तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात घट होण्याची भीती निर्माण झाली होती. या वर्षी एकाच हंगामात नियमित कीडरोगासह महापूर,अवकाळी ही तीन नवी संकटे सोयाबीन पिकावर आल्याने शेतकरी धास्तावला आहे. सततचे दमट वातावरण, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव, वातावरणातील बदल यामुळे यावर्षी ऐन काढणीला असलेल्या सोयाबीन पिकावर पावसाने अस्मानी संकट ओढवले आहे.

सोयाबीनचा दर धोक्यात

यंदा दहा वर्षात प्रथमच सोयाबीनला उच्चांकी दर मिळाला आहे.मात्र पडणाऱ्या पावसामुळे उत्पादनाबरोबर सोयाबीनचा दरही चांगलाच खालावण्याची चिन्हे आहेत.10 आद्रतेच्या वर टनाला 8 हजारापर्यंत दर आहे.सध्याच्या स्थितीत सोयाबीनची मळणी केली तर वाळवण्यासाठी शेतकऱ्यांना जास्त धडपडावे लागणार आहे. आताच्या वातावरणात 20 ते 25 आद्रतेचे प्रणाम टिकून राहते. याला दर टनाला 5 हजारापर्यंत बाजारात आहे.

केडी 726,753 तारणार

तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात सुमारे 50 टक्के क्षेत्रात शेतकऱ्यांनी केडी 726,753 या प्रजातीच्या सोयाबीनचा पेरा घेतला आहे. यांचा कालावधी जास्त असून सध्या हे पीक शेंगा भरणीच्या अवस्थेत आहे. सप्टेंबरच्या शेवटी अथवा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही पिके काढणीला येतात.त्यावेळी पावसाचा परिणाम होत नसल्याने हे सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांना तारणार आहे.

हातकणंगले तालुका सोयाबीन पीक

पेरणी - 10 हजार 867 हेक्टर

महापुर, अतिवृष्टी नुकसान - 1 हजार 200 हेक्टर

जीवित पीक - 9 हजार 667 हेक्टर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

Latest Marathi News Updates : दक्षिण मुंबईतील गणेशोत्सव मंडळांची बैठक सुरु, अडचणींवर व नियोजनाबाबत होणार चर्चा

Video: प्रेमाची तालिबानी शिक्षा! काकाच्या मुलीवर प्रेम जडलं; रागात गावकऱ्यांनी प्रेमीयुगुलांना नांगराला जुंपलं, व्हिडिओ व्हायरल

८ चेंडूंत ६ विकेट्स.. पाच त्रिफळाचीत ! Kishor Kumar Sadhak ने इंग्लंडमध्ये सलग दोन षटकांत घेतल्या दोन Hat-Tricks

Parenting tips: पेराल ते उगवेल, आई वडिलांकडून अशा प्रकारे सवयी शिकतात मुलं

SCROLL FOR NEXT