पश्चिम महाराष्ट्र

पांढरपाणी येथे शिवकालीन विहीर भागवतेय तहान

अमर पाटील

बांबवडे - शिवकालीन विहिरीत आजही असलेला उत्तम पाण्याचा स्रोत म्हणजे शिवकालीन स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना! पांढरपाणी (ता. शाहूवाडी) येथील शिवकालीन विहीर आजही पिण्याच्या पाण्याकरिता गावासाठी वरदान ठरत आहे. जीर्ण झालेल्या या विहिरीचे संवर्धन होण्यासाठी लोकसहभागाची गरज आहे.

पांढरपाणी हे गाव इतिहासात चौकीवाडी म्हणून ओळखले जायचे. त्याठिकाणी पांढऱ्या रंगाचे पाणी वाहणारा ओढा असल्याने त्या ठिकणावरुन त्यास ‘पांढरपाणी’ असे नाव पडले. छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी घोड्यांना पाणी पाहण्याचे ठिकाण ठरविले होते. त्यासाठी याठिकाणी मोठा तलाव बांधला होता. त्या तलाव्यातील पाण्यावर याठिकाणी मोठी पहारा देणारी चौकी होती. छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरुन विशाळगडाकडे जात असताना या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबले असता एका चाचे अज्जीने महाराजांना भाजी-भाकरी  खाऊ घातली. त्यावर महाराजांनी चाचे आज्जीला काय हवे? असे विचारले असता. चाचे आज्जीने माझ्या गावाला पिण्यासाठी पाणी नाही. राजे माझ्या गावासाठी विहीर द्या, असे सांगितले. तेव्हा महाराजांनी ही विहिरी खोदून दिली. आजहीही विहिरी शिवाजी महाराजांची विहीर म्हणून ओळखली जाते. अशी मौखिक दंत कथा येथील वयोवृद्ध सांगतात. पन्हाळगड ते पावनखिंड यादरम्यान पायवाटेने चालत जातात विहीर पाहावयास मिळते.

त्या काळातील भूगर्भातील पाणी शोधण्याचे तंत्र, साडेतीनशे वर्षापूर्वी सापडलेला पाण्याचा उगम हा त्यानंतर कित्येक नैसर्गिक आपत्तींपासून सुरक्षित आहे. परंतु आज साडेतीनशे वर्षापूर्वी बांधलेल्या या विहीरीचे अवशेष मात्र जीर्ण झाले आहेत.
इतिहासकालीन असे काही अवशेष सापडले आहेत पण  त्याकडे प्रशासनाचे लक्ष नाही. त्याचे दाखले व पुरावे या अभावी त्यांचे संवर्धन झाले नाही. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांच्या विशाळगडावरील लिहिलेल्या पुस्तकात या विहिरीचा उल्लेख आहे.

परंतु या मौखिक पुराव्यावर अजून बऱ्याच इतिहासकालीन वास्तू आहेत. परंतु त्यांना कागदोपत्री पुरावे नसल्यामुळे पुरातत्त्व विभागाकडे त्यांचे संवर्धन झाले नाही. ही विहिरही त्याचाच एक भाग आहे. या विहिरीचा शोध अलिकडील काही वर्षात लागला आहे. त्यामुळे त्या विहिरीचे पुरातत्त्व विभागाकडे संवर्धन करण्याची जबाबदारी नाही. परंतु लोक सहभागातून या वास्तूचे संवर्धन व्हावे असे गावकऱ्यांना वाटते. 

अनेक इतिहासकालीन वास्तूंचे व ठिकाणांचे कागदोपत्री पुरावे मिळालेले नाहीत. या विहिरीची बांधकामशैली जुनीच आहे. मौखिकरीत्या या कथा जरी असल्या तरी इतिहासाच्या वारसास्थळांचे जतन व्हावे. 
- इंद्रजित सावंत, इतिहास अभ्यासक.

शिवाजी महाराजांनी बांधलेल्या या वििहरीचे जतन झाले पाहिजे यासाठी आम्ही नेते मंडळींकडे पाठपुरावा केला. पण कोणीच लक्ष घातले नाही. तरी या विहिरीचे जतन व्हावी ही अपेक्षा आहे. 
- शामराव कासार, ज्येष्ठ नागरिक, पांढरपाणी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Businessman Office Firing : पुण्यात व्यावसायिकाच्या कार्यालयावर गोळीबार; लॉरेन्स बिश्नोई गँगने जबाबदारी स्विकारली, पोस्ट व्हायरल

Fifa World Cup 2026 : किलियन एम्बाप्पेचा पराक्रम! लिओनेल मेस्सी, रोनाल्डोला सोडलं मागे; फ्रान्सच्या विजय अन् बाद फेरीत प्रवेश

निधी मिळत नाही बोंब मारणाऱ्या खासदारांची गोची करणारी आकडेवारी! २ वर्षांत ६ जणांना मिळाले १०० कोटी, जनतेसाठी वापरले फक्त १३ कोटी

Latest Marathi News Live Update : अधिक मासात त्र्यंबकेश्वराला साडेसहा कोटींची देणगी, ११ लाखांहून अधिक भाविकांचे दर्शन

Mahavitaran Smart Meter : स्मार्ट मीटर की स्मार्ट लूट? वीज बिल तिप्पट झाल्याचा ग्राहकांचा गंभीर आरोप, राज्यात संतापाचे वातावरण

SCROLL FOR NEXT