Dr. Jyotiraditya Shinde speaking in campaign for Vishwajit Kadam
Dr. Jyotiraditya Shinde speaking in campaign for Vishwajit Kadam 
पश्चिम महाराष्ट्र

ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले भाजपमुळेच उद्योगात अग्रेसर महाराष्ट्र पिछाडीवर 

सकाळ वृत्तसेवा

पलूस - भाजप सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल केली. औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर महाराष्ट्र गेल्या पाच वर्षात पिछाडीवर गेला आहे हे भाजप सरकारचे हे अपयश आहे, अशी टीका काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी केली. आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्यात राज्याचे नेतृत्व करण्याची ताकद आणि धमक असल्याचेही ते म्हणाले. 

येथे काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम, आमदार डॉ. कदम, आनंदराव मोहिते, जिल्हा बॅंकेचे संचालक महेंद्र लाड उपस्थित होते. 

श्री. शिंदे म्हणाले,""दिवंगत आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी कठीण परिस्थितीत भारती विद्यापीठ स्थापन केले. हजारोंना रोजगार दिला. ताकारी, टेंभू योजना मार्गी लावली. ते सामान्यांसाठी वटवृक्ष होते. आमदार डॉ. विश्वजित यांच्या रुपाने तरुण नेतृत्व पुढे आले. त्यांचा भविष्य काळ उज्ज्वल आहे.'' 

श्री. शिंदे म्हणाले,""पाणी योजनांची दूरवस्था झाली. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही. वीज बिले सुध्दा माफ झाली नाहीत.'' 
आमदार डॉ. कदम म्हणाले,""दिवंगत आमदार डॉ. पतंगराव कदम, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माधवराव शिंदे यांचे प्रेमाचे नाते होते. त्याचप्रमाणे ज्योतिरादित्य आणि माझे संबंध आहेत. ते मार्गदर्शन करीत आहेत. सरकार कोणाचेही असो विकास ताकदीने करू.'' 

काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ए. डी. पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मारुती चव्हाण, पी. आर. मुळे यांची भाषणे झाली. जे. के. बापू जाधव, खाशाबा दळवी, सुहास पुदाले, गणपतराव पुदाले, श्वेता बिरनाळे, बाळासाहेब पवार, विक्रम पाटील, जयसिंग कदम, रघुनाथ कदम, कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, मतदार महिला उपस्थित होत्या. पलूस बॅंकेचे अध्यक्ष वैभव पुदाले यांनी स्वागत केले. गिरीश गोंदिल यांनी आभार मानले. 

"मी महाराष्ट्राचा आहे. सातारा जिल्ह्यातील कण्हेरखेड हे माझे गांव. महाराष्ट्रावर माझे विशेष प्रेम आहे' असे सांगत ज्योतिरादित्य यांनी भाषण मराठीतून केले. 

जनसेवक पतंगराव... 
दिवंगत पतंगराव कदम यांचे काम मोठे आहे. ते राजकारणी नव्हते, जनसेवक होते. सध्या विश्वजित कदम यांनाही जनसेवक म्हणून निवडून द्या, असे आवाहन ज्योतिरादित्य शिंदे यांनी केले. काळ कसोटी आणि वारसा संघर्षाचा आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Supriya Sule : आईवर बोलला तर करारा जबाब देईन - सुप्रिया सुळे

Arvind Kejriwal : ''केजरीवाल अन् सिसोदिया यांच्याविरोधात एकसारखेच पुरावे कसे? सिंघवींचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद

Rahul Gandhi: राहुल गांधींनी रायबरेली निवडल्यानं निरुपम यांचा हल्लाबोल; म्हणाले, पळून गेले...

SRH vs RR, IPL 2024: 'भयानक अंपायरिंग...', हेडची बॅट हवेत होती असं सांगत माजी भारतीय क्रिकेटरने थर्ड अंपायरवर साधला निशाणा

SCROLL FOR NEXT